- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम सुरू असतांनाच बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार,आज, मंगळवार २१ ऑक्टोंबरपासून पुढील २५ ऑक्टोंबरपर्यंत विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आज,मंगळवार २१ ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर,गडचिरोली, लातूर,नांदेड,परभणी,हिंगोली,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,वाशिम,अकोला,यवतमाळ यांना पावसाचे यलो अलर्ट देण्यात आले आहे.तर उद्या,बुधवार २२ ऑक्टोंबर रोजी चंद्रपूर,गडचिरोली, सांगली,कोल्हापूर,धाराशिव,लातूर,नांदेड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,बुलढाणा,सातारा,यवतमाळ यांना पावसाचे अलर्ट देण्यात आले आहे.तर २३ ऑक्टोंबर रोजी वर्धा, चंद्रपूर गोंदिया,गडचिरोली,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,धाराशिव, लातूर,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,पुणे,सातारा,बीड,नांदेड, वाशिम,यवतमाळ या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आले आहे.तर २४ ऑक्टोंबर रोजी वर्धा,नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली,बीड,धाराशिव,लातूर,अकोला,अमरावती, यवतमाळ,रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,कोल्हापूर, सांगली,सातारा,पुणे,नगर,सोलापूर,नांदेड,वाशिम, बुलढाणा यांना अलर्ट देण्यात आला आहे.तसेच २५ ऑक्टोंबर रोजी सातारा,सांगली,सोलापूर,नगर,छत्रपती संभाजीनगर,बीड,धाराशिव,रायगड, रत्नागिरी,पुणे सह संपूर्ण विदर्भात पावसाच्या धारा कोसळणार आहेत.ऐन सणासुदीच्या काळात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन केंद्रे सक्रिय केली असून, पूरनियंत्रण यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
- Advertisement -

