Tuesday, June 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपावसाने दाणादाण; मुख्यमंत्री अलर्ट मोडवर.. - जिल्हाधिकाऱ्यांना दिले मदतीचे सर्व अधिकार; थेट...

पावसाने दाणादाण; मुख्यमंत्री अलर्ट मोडवर.. – जिल्हाधिकाऱ्यांना दिले मदतीचे सर्व अधिकार; थेट पैसे देण्याचेही अधिकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण होऊन शेतीचे नुकसान,घरांची पडझड,जनावरे तसेच नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याच्या मोठ्या घटना घडल्या असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अलर्ट मोडवर येत त्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.राज्यात तब्बल १४ लाख एकर पिकांचे नुकसान झाले असल्याचे  सांगितले.राज्यात अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली असल्याचे देखील त्यांनी सांगितले. अश्यातच राज्यातील परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.मुंबईतील मिठी नदी धोका पातळीवर गेली असल्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागले असल्याचेही त्यांनी सांगितले.अलीकडच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात असल्याने सध्या स्थितीत ज्या जिल्ह्यात शेती,घरे,जनावरे व इतर नुकसान किंवा एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय,अश्यांना मदत करण्याचे सर्व अधिकार हे त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.तसेच एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना तात्काळ मदत करू शकतात.त्यांना थेट पैसे देण्याचेही अधिकार दिलेले आहे.त्यामुळे तिथे अडचण येणार नाही.शेती संदर्भात देखील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.मुंबईतील नागरिकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त लोकांना वर्क फॉर्म होम देण्याचे निर्देश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आतापर्यंतची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात असली तरी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि टायफाइड असल्यामुळे उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!