Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीपत्नीला आणायला सासरी गेला; पण त्याला हात धरून घराबाहेर काढले.. -मनावर घेत...

पत्नीला आणायला सासरी गेला; पण त्याला हात धरून घराबाहेर काढले.. -मनावर घेत राहत्या घरी गळफास घेवून केली आत्महत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-एकाच गावात वास्तव्यास असणाऱ्या दोघांनीही १३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला.वैवाहिक जीवनात दोन अपत्ये झाली.दोघेही सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली.अश्यातच दोघांच्याही सुखी संसारास कुणाची तरी नजर लागली आणि दोघांमध्ये वाद सुरू झाले.अश्यातच पत्नी माहेरी निघून गेली ती तब्बल दीड वर्षे घरी परतलीच नाही.पती पत्नीला आणायला सासरी गेला; पण त्याला हात धरून घराबाहेर काढले.त्याच्या मनाला चटका लागला आणि तब्बल १३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या प्रेमाचा शेवट पत्नीने घेतलेल्या एका निर्णयामुळे झाल्याची धक्कादायक घटना काल रविवारी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यात उघडकीस आली.मानसिक तणावात गेलेल्या पतीने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.सुधाकर नाजुकराव मडावी वय ३६ वर्षे रा.येरकड,ता.धानोरा, जि.गडचिरोली असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
धानोरा तालुका मुख्यालयापासून १२ किलोमिटर अंतरावर असलेल्या येरकड गावातील मनीषा केशव उसेंडी व सुधाकर मडावी यांचा प्रेमविवाह १३ वर्षांपूर्वी झाला होता.सुखाने संसार सुरू असतांनाच अचानक पती-पत्नीत वादविवाद झाल्याने पत्नी मनीषा ही एप्रिल २०२४ मध्ये आपल्या आई- वडिलांकडे निघून गेली. तेव्हापासून ती सासरी परतलीच नाही.त्यामुळे सुधाकर जून २०२५ मधे चेन्नई येथील खासगी कंपनीत कामासाठी गेला होता.कामासाठी गेलेला सुधाकर आठवडाभरापूर्वीच परत आला होता आणि पत्नीला आणण्यासाठी सासरी गेला.मात्र सासू-सासऱ्यांनी मुलीला पाठविण्यास नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या
सुधाकरने राहत्या घरीच गळफास घेवून आत्महत्या केली.
  • मृताचे वडील नाजुकराव मडावी👇
माझा मुलगा पत्नीला आणायला सासर मंडळीकडे गेला असता,त्यांनी त्याला हात धरून घराबाहेर काढले.मुलगी पाठवत नाही,वेळ आल्यास माझ्या मुलीचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत लावून देतो,असे ठामपणे सांगितले.ही बाब त्याने मनावर घेत आत्महत्या केली.माझ्या मुलाच्या आत्महत्येस त्याच्या सासरकडील मंडळीच जबाबदार असून पोलिस विभागाने योग्य चौकशी करून कारवाई करावी.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!