Wednesday, June 24, 2026
Homeजालनानायब तहसिलदाराचे परस्त्रीशी अनैतिक संबंध; शिक्षिका पत्नीने केली आत्महत्या

नायब तहसिलदाराचे परस्त्रीशी अनैतिक संबंध; शिक्षिका पत्नीने केली आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

जालना :- शहरातील मोती तलावाच्या चौपाटीवरून शनिवारी २८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी स्वतःला झोकून देत जयश्री गणेश पोलास यांनी कौटुंबिक वादातून उडी घेऊन आत्महत्या केली होती.या प्रकरणी जयश्री पोलास यांच्या भावाच्या तक्रारी वरून आरोपी पती नायब तहसीलदार गणेश पोलास यांच्यावर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. आज सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मयत जयश्री पोलास यांचे भाऊ संजय चिंतल यांनी दिलेल्या तक्रारीत, जयश्री यांचे सन २००० साली गणेश व्यंकटेश पोलास याच्यासोबत लग्न झालेले असून त्यांना सुदीप (वय २१ वर्ष) व सुजय (वय १७ वर्ष) अशी २ मुले आहेत. गणेश व्यंकटेश पोलास हे जयश्री हीस चांगली वागणूक देत होते. पण सन २०२० मध्ये गणेश पोलास यांचे परस्त्री सोबत संबंध असल्याचे जयश्री यांना कळाले. जयश्री यांनी गणेश पोलास यांना वारंवार समजावून सांगितले. पण गणेश पोलास याच्यावर काहीच फरक पडत नसल्याने जयश्री यांनी माहेरच्या व सासरच्या लोकांना सांगितले. तरीही त्याच्या वागण्यात काहीही फरक पडेना.

उलट तो पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करू लागला. यामुळे नवरा बायकोत वारंवार खटके उडू लागले. गणेश याने जयश्री हिस मुद्दाम त्रास देण्यास सुरवात केली. अखेर २८ जानेवारी रोजी जयश्री हिने मोती तलाव जालना येथे उडी मारून आत्महत्या करुन जाचातून स्वतःला मुक्त केले.
या घटनेनंतर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गणेश पोलास यांच्या विरुद्ध कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आज त्याला कोर्टापुढे हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, पुरवठा खात्यातील गणेश पोलास याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!