Wednesday, June 24, 2026
Homeजालनाअजबच प्रकार..अन् परीक्षेसाठी एकही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचलाच नाही.....- बारावीच्या परीक्षेचा हिंदी विषयाचा...

अजबच प्रकार..अन् परीक्षेसाठी एकही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचलाच नाही…..- बारावीच्या परीक्षेचा हिंदी विषयाचा होता पेपर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

जालना :-एकीकडे राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत.यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.जालन्यातही शिक्षण विभागाबरोबरच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करून परीक्षा केंद्रांवर भेटी देत आहेत. काल जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी कॉपी करतांना १६ विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडले आहे.त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घाबरण्याजोगे वातावरण पसरले आहे.

जलण्यातील जामवाडी येथील रंगनाथराव पाटील परीक्षा केंद्रावर हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी फिरकला नाही.त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोलीस,केंद्रप्रमुख यांच्यासह सर्वांना ताटकळत बसावे लागले.आज बारावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. राष्‍ट्रभाषेचा पेपर असयांना या विषयाकडे विद्यार्थ्यानी पाठ फिरविल्‍याचे दिसून आले.हिंदी हा विषय दोनच विद्यार्थ्यांनी घेतलेला होता.मात्र केंद्र प्रमुखांनी दोन्हीही विद्यार्थ्यांना फोन लावून परिक्षेला बोलावले; तरीही विद्यार्थी परीक्षेसाठी आले नाहीत.त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेत शुकशुकाट पाहायला मिळाला. एकही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी न आल्यानं शिक्षकांना देखील पेपर न घेताच रिकाम्या हाताने परीक्षा केंद्रावरून मागे परतावे लागले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!