- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
जालना :-पुलाच्या बांधकामासाठी अवैध वाळू उपसा करून वाळू भरलेला टिप्पर टिनाच्या शेडवर टाकून खाली करण्यात आल्याने शेड खाली झोपलेल्या ५ मजुरांचा वाळू खाली दबून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार २२ फेब्रुवारीला पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात घडली.गणेश काशिनाथ धनवई वय ५१ वर्षे,रा.गोळेगाव,ता.सिल्लोड,भूषण गणेश धनवई वय १७ वर्षे,रा. गोळेगाव,ता.सिल्लोड,राजेंद्र दगडूबा वाघ वय ४१ वर्षे, रा.दहिद,ता.बुलढाणा,सुनील समाधान सपकाळ वय २० वर्षे,रा.पद्मावती,ता.भोकरदन जि.जालना,सुपडू आहेर वय ३९ वर्षे,रा.तोंडापूर, ता.जामनेर,जि.जळगाव अशी मृतकांची नावे आहेत.
माहितीनुसार,पासोडी शिवारामध्ये पुलाचे बांधकाम सुरू आहे.कामासाठी स्वस्त वाळू उपलब्ध व्हावी म्हणून कंत्राटदार रात्रीच्या सुमारास अवैध वाळू आणून टाकत होता.अशातच चालकाच्या निष्काळजीपणामुळे पाच जणांचा मृत्यू झाला.पुलाच्या बांधकामाच्या जवळच कामासाठी आलेल्या मजुरांनी वास्तव्यासाठी टिनाच्या पत्र्याचे शेड उभारले.मध्यरात्रीच्या सुमारास चालकाने निष्काळजीपणाने वाळूचा टिप्पर शेडवर रिकामा केला.त्यामुळे शेडमध्ये झोपलेले सहा जण वाळू खाली दबले गेले.सदरचा प्रकार शेड बाहेर झोपलेल्या महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केली.महिलेने आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना बोलावून आणले. त्यांनी वाळूचा ढिगारा हटवत सहा जणांना बाहेर काढले. यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला.तर एक १२ वर्षांच्या मुलीला वाचवण्यात यश आले आहे.घटनेची माहिती मिळताच जाफराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले.
- Advertisement -

