- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-लोकमान्य टिळक टर्मिनन्सहून शालीमारला जाणाऱ्या शालीमार एक्सप्रेसचे दोन डबे नागपूरजवळ
रेल्वेरुळावरून घसरल्याची घटना आज,मंगळवारी २२ ऑक्टोंबरच्या दुपारी घडली.सुदैवाने यात कोणतीही जीविहानी झाली नाही.
अपघातानंतर मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.नागपूरमधील इतवारी स्थानकाजवळ आज दुपारी २ वाजता शालीमार एक्सप्रेसचे एस १ आणि एस २ हे दोन डबे रुळावरून घसरले.माहिती होताच लगेच रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक दिलीप सिंग यांनी कळविले.प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न सुरू होते.अपघातानंतर एक हेल्पलाइन स्थापन करण्यात आली असून,बाधित प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत; असेही सिंह पुढे म्हणाले.
- Advertisement -

