- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-भाजपने शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावर काँग्रेसला घेरले असतांना पुन्हा एकदा लोकसभेपाठोपाठ संविधान रक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस राज्यातील विधानसभा निवडणुकीला आक्रमकपणे सामोरे जाण्याच्या पवित्र्यात आहे.आज,बुधवार ६ नोव्हेंबरला दुपारी नागपुरात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे विशेष विमानाने आगमन झाल्यानंतर त्यांचे उत्साहात स्वागत झाले.
नागपूर विमानतळावर व रस्त्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या स्वागताचा स्वीकार करून ते थेट पवित्र दीक्षाभूमीवर पोहोचले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई,सचिव विलास गजघाटे यांच्या नेतृत्वात त्यांचे स्वागत करण्यात आले.यानंतर त्यांनी दीक्षाभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन केले.
यावेळी राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,खासदार श्याम बर्वे,शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे,प्रफुल्ल गुडघे,बंटी शेळके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यानंतर दक्षिण पश्चिम,पश्चिम व दक्षिण मतदार संघातील काही भागातून रस्त्याने जात ते दुतर्फा उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांचे,नागपूरकरांचे स्वागत स्वीकारून रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात ओबीसी युवा मंच व विविध संघटना तर्फे आयोजित संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित झाले.त्यानंतर ते मुंबईला रवाना रवाना होत मुंबईत महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे.
- Advertisement -

