उद्रेक न्युज वृत्त :-नक्षलवाद्यांनी आतापर्यंत हजारो निष्पाप आदिवासी व नागरिकांना क्रूरपणे मारले आहे.त्यांनी सरकारसमोर शांतता चर्चेची विनंती केली आहे,ही चांगली बाब आहे.मात्र,त्याअगोदर काही अटींचे त्यांना पालन करायला लावणे अनिवार्य आहे.येत्या १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, सीपीआय (माओवादी) पक्षाच्या भूमिगत नेत्यांनी उघडपणे समोर येऊन हजारो निष्पाप आदिवासी आणि दलितांच्या हत्येबद्दल जाहीरपणे माफी मागावी.तसेच भारतीय संविधानावर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी जाहीर करावे. माओवादी चळवळीतील नेते मुख्य प्रवाहातील संवैधानिक प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक आहे, हे त्यांनी जनतेला सांगावे.त्यांनी सीपीआय (माओवादी)पक्ष विसर्जित करावा व सर्व शस्त्रे तसेच दारूगोळा पोलिसांच्या हवाली करावा.माओवादी पक्षाच्या सरचिटणीसांपासून ते पीएलजीएच्या शेवटच्या नक्षलवाद्यापर्यंत सर्वांनीच सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण करावे,अशी अट टाकण्यात यावी.तसेच माओवाद्यांनी त्यांच्या शहरी आघाडीच्या संघटना आणि कार्यकर्त्यांची नावे उघडपणे जाहीर करावीत.त्यांच्याशी निगडित शहरी संघटना बरखास्त कराव्या ही महत्त्वाची अट त्यांच्यासमोर टाकायला हवी,अशी पत्रातून नागपूर जनसंघर्ष समितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी केली आहे.
नक्षलवाद्यांनी हजारो निष्पाप आदिवासी आणि दलितांच्या हत्येबद्दल जाहीरपणे माफी मागावी.. – जनसंघर्ष समिती…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

