- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सध्याच्या घडीलाच नाही तर अनादिकाळापासून दोनच असे मौल्यवान धातू आहेत की,ते ताजे,नगदी आणि तात्काळ पैसे देणारे धातू आहेत. ते म्हणजे सोने आणि चांदी.त्यामुळेच त्यांच्या किंमती कितीही वाढल्या तरीही अनेकजण त्यात गुंतवणूक करतांना दिसून येतात.सोने-चांदीचा भाव दररोज कमी जास्त होत असतो.याचे मुख्य कारण म्हणजे,आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिरता आणि अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ वा कमजोरी,सोने-चांदीच्या जागतिक मागणीत वाढ किंवा घट तसेच गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराकडे कमी-अधिक कल यामुळे दररोज सोने-चांदीचे दर कधी कमी होतात तर कधी जास्त होतांना दिसून येतात.२१ ऑक्टोंबरच्या तुलनेत,२२ ऑक्टोंबर रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली होती.२४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३२ हजार ३५५ प्रति १० ग्रॅमवरून(३ टक्के जीएसटीसह)थेट १ लाख २५ हजार ७६३ रुपयांपर्यंत खाली आला होता.केवळ २४ तासांतच ६ हजार ५२२ रुपयांची घसरण नोंदवली गेली होती.तर काल गुरुवारी मोठी उलथापालथ होऊन नागपुरात सोन्याने तेजीचा सूर लावत १ हजार २३६ रुपयांची वाढ नोंदवली गेली.त्यानुसार काल गुरुवारी ३ टक्के जीएसटीसह २४ कॅरेट सोने १ लाख २७ हजार ७२० रुपयांवर पोहोचले.त्यातच चांदीचे दर २० ऑक्टोंबरला १ लाख ७३ हजार ०४० रुपये.
२१ ऑक्टोंबरला १ लाख ७३ हजार ७६१ रुपये तर
२२ ऑक्टोंबर रोजी १ लाख ६२ हजार ७६४ रुपयांवर पोहचली.त्यातच काल गुरुवारी एक किलो चांदीचे भाव १ लाख ५८ हजार ६२० रुपयांपर्यंत खाली आले.
सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून वाढलेली मागणी आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली.तर औद्योगिक मागणीत घट आणि जागतिक बाजारातील मंदीच्या प्रभावामुळे चांदीचे दर कोसळले.
- Advertisement -

