- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-काही महिला सर्वकाही सुरळीत सुरू असतांनाच रागाच्या भरात अनेकांना कायद्याच्या कचाट्यात पकडुन वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करू पाहतात आणि हल्ली अनेक पुरुषांच्या बाबतीत असे घडतांना दिसून येत आहे.मात्र,कायद्याची प्रभावी मांडणी आणि न्यायपालिकेला पटवून दिलेला युक्तिवाद हा कधीही निष्फळ ठरत नसतो.अश्याच प्रकारे एका विवाहित महिलेने तब्बल दीड वर्षांनी तिच्यावर झालेल्या बलात्काराची तक्रार पोलिसांत दाखल केली.त्यानुसार, पोलिसांनी आरोपीविरोधात एफआयआर(प्रथम खबरी अहवाल)नोंदवून प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी)न्यायालयात खटला दाखल केला होता.प्रकरणी आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आणि खटल्याची बाजूच पलटली.ज्ञानेश्वर देवराव साबळे वय ४४ वर्षे, रा.समुद्रपूर,जि.वर्धा असे आरोपीचे नाव असून आरोपीने ५ मे २०२३ रोजी बलात्कार करून ठार मारण्याच धमकी दिली, अशी तक्रार महिलेने २८ डिसेंबर २०२४ रोजी केली होती.त्यावरून गिरड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.अश्यातच आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाची मागणी केली.आरोपीतर्फे ॲड.एस.ओ.अहमद यांनी बाजू मांडली आणि महिलेने केलेल्या आरोपाचे खंडन केले.परिणामी,तक्रारीवर संशय उत्पन्न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फलके यांनी वादग्रस्त एफआयआर व खटला रद्द केला.विशेष म्हणजे, महिलेने तिच्यावरील बलात्काराची तक्रार करण्यासाठी तब्बल दीड वर्ष विलंब केला.त्यातच,बलात्कारसारखे गंभीर प्रकरण असतांनाही विलंबाचे कोणतेही ठोस कारणही दिले नाही,तसेच माहिती देण्यात विसंगती आढळून आली.न्यायालयाच्या लक्षात येताच संपूर्ण खटलाच खारीज केला.
- Advertisement -

