- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- ‘सिर्फ हंगामा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए…’ या ओळींना साजेशी वाटचाल करुन डॉ.नामदेव किरसान यांनी नेतृत्व व कर्तृत्वाची चुणूक दाखवली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागात उपायुक्त ते गडचिरोली-चिमूर मतदारसंघाचे खासदार हा त्यांचा प्रवास सर्वांना अचंबित करणारा आहे.
जनतेनेच निवडणूक हाती घेतली तर काय चमत्कार होऊ शकतो,याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत आला.अनेक संकटे आली,कठीण प्रसंग आले,पण अढळ निष्ठा,सचोटीच्या जोरावर सामान्यांच्या न्याय हक्कासाठीची लढाई त्यांनी सोडली नाही. उच्चशिक्षित असलेले खासदार डॉ.नामदेव किरसान यांना नुकताच ‘लोकमत’च्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेच्या ‘लोकमत लोकनायक’ सन्मान प्रदान करण्यात आला. गोविंदपूर,जि.गोंदिया येथे सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले नामदेव किरसान हे शिक्षणाची कास धरून राज्यसेवा परीक्षेचा गड सर करत राज्य उत्पादन शुल्क विभागात वर्ग १ च्या हुद्द्यापर्यंत पोहोचले.१८ वर्षे नोकरी केल्यावर उपायुक्त पदावर असताना स्वेच्छानिवृत्ती घेऊन ते सक्रिय राजकारणात आले.काँग्रेसचे विचार घराघरात व मनामनात पोहोचण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. डॉ.किरसान यांनी पक्षबांधणी करतानाच भाजप सरकारच्या विरोधात अनेक आंदोलने केली.सोनिया गांधी,राहुल गांधी तसेच काँग्रेसचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली.पक्ष संघटनेत विविध पदे भूषविली. आदिवासी सेवक या पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. २०२४ मध्ये काँग्रेसने त्यांना संधी दिली.दहा वर्षे सत्तारुढ असलेल्या भाजपला आस्मान दाखवत त्यांनी विजयी मुसंडी मारली.गडचिरोली- चिमूरच्या सर्वांगीण विकासाचा त्यांचा संकल्प आहे.
- Advertisement -

