Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विम्याची रक्कम न भरता शेतकऱ्यांना...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विम्याची रक्कम न भरता शेतकऱ्यांना २ लाखाची मदत- जिल्ह्यातील २४ जणांना लाभ मंजूर

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- काहीवेळा शेती व्यवसाय करताना होणाऱ्या अपघातामुळे शेतकऱ्याला मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व स्वकारावे लागते.अश्या कालावधीत शेतकऱ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावते. त्यासाठीच सदर योजना काढली गेली होती. जेणेकरून गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात शासनाकडून दिला जाईल.नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्य शासन चालविणार असल्याचे घोषित केले होते.खाजगी विमा कंपन्यांकडून होणारा नाहक त्रास कमी करण्यासाठी शासनाने ही घोषणा केली. या नंतर लगेच जिल्हयातील प्रलंबित २४ जणांचे प्रस्ताव कृष‍ि आयुक्तालयाकडून मंजूरही झाले.

शेती करताना शेतकऱ्याला अपघाती मृत्यू येतो.त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात.जसे कि अंगावर वीज पडून मृत्यू येणे,नैसर्गिक आपत्ती,पूर,सर्पदंश, विंचूदंश, वाहन अपघात,रस्त्यावरील अपघात,विजेचा शॉक लागून मृत्यू अश्या वेगवेगळ्या कारणांमुळे शेतकऱ्याला अपंगत्व किंवा मृत्यू ओढवला जातो. आणि शेतकरी कुटुंबाचा आधार जातो.त्यामुळे या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता,महाराष्ट्र सरकारने हि योजना सुरु केली तेव्हा त्याचे नाव ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ असे होते ते बदलून ‘गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात योजना’ असे करण्यात आले. २००९-१० मध्ये या योजनेसाठी १ लाख एवढा विमा संरक्षित केला गेला होता परंतु ह्या योजनेचे कल्याणकारी स्वरूप लक्ष्यात घेता रक्कम वाढवून २ लाख एवढी करण्यात आली.जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर या कारणास्तव त्याला २ लाख एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जाईल.शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमवावे लागले, तर त्याला २ लाख एवढा विमा देण्यात येईल.शेतकऱ्याचा अपघातामध्ये एक डोळा व एक अवयव निकामी झाला असेल, तर त्या शेकऱ्याच्या कुटुंबाला २ लाख  रक्कम विमाच्या स्वरूपात दिली जाणार आहे.अपघातामध्ये शेतकऱ्याचा एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला असेल,तर त्याला १ लाख विमा दिला जाईल. महाराष्ट्रतील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदी नुसार खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितिधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई,वडिल,लाभार्थी चे पती/पत्नी,मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकुण दोन जणांना लाभ घेता येईल.

या सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका अथवा जिल्हा कृषी कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!