Friday, May 1, 2026
Homeनागपूरखाद्य तेलाचा भडका; गृहिणींचे बजेट कोलमडले..

खाद्य तेलाचा भडका; गृहिणींचे बजेट कोलमडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-आखाती देशातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून,त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होत आहे.नागपूरच्या बाजारपेठेत सोयाबीन,सूर्यफूल,मका आणि पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात घटल्याने किंमतीत १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे.हे युद्ध पुढील १५ दिवस असेच सुरू राहिले,तर खाद्यतेलाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.नागपुरात सर्वाधिक विक्रीचे सोयाबीन तेल १५ दिवसांत प्रतिकिलो २० रुपयांनी महागले.भारतात सूर्यफूल आणि पाम तेलाची मोठी आयात रशिया,युक्रेन,मलेशिया आणि इंडोनिशिया सारख्या देशांतून होते.मात्र,युद्धामुळे जहाजांची ये-जा थांबली असून आयातीवर मर्यादा आल्या आहेत.यामुळे सोयाबीन व सूर्यफूल या तेलांच्या टिनाच्या डब्यामागे १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे.तसेच हॉटेल आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या मका व पाम या तेलांच्या आवकीतही घट झाली आहे.आधीच डाळी आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त असलेल्या गृहिणींच्या अडचणीत आता तेलाच्या दरवाढीने भर टाकली आहे.आधीच महागाई शिगेला पोहोचली आहे,त्यात आता फोडणीसाठी लागणारे तेलही महागल्याने महिनाभराचे नियोजन कसे करावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.व्यापाऱ्यांच्या मते,युद्ध स्थिती पुढील दोन आठवड्यात निवळली नाही,तर कच्च्या मालाचा पुरवठा ठप्प होईल.अशा स्थितीत खाद्यतेलाचे दर प्रतिलिटर १५ ते २० रुपयांनी आणखी वाढू शकतात.१५ दिवसांआधी सोयाबीनचे तेल १४६ रुपये किलो होते,तर आता १६६ रुपये प्रति किलो झाले आहे.अश्याच प्रकारे शेंगदाणा १८० वरून १९० रुपये,सूर्यफूल १७० वरून १९०,मोहरी १६० वरून १८०,पाम तेल १४५ वरून १६०,जवस तेल १६५ वरून १८० रुपये तर खोबरेल तेल ४४० वरून ४५० रुपये प्रति किलो झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!