नागपूर :-आखाती देशातील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून,त्याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होत आहे.नागपूरच्या बाजारपेठेत सोयाबीन,सूर्यफूल,मका आणि पाम तेलाची आयात मोठ्या प्रमाणात घटल्याने किंमतीत १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली आहे.हे युद्ध पुढील १५ दिवस असेच सुरू राहिले,तर खाद्यतेलाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.नागपुरात सर्वाधिक विक्रीचे सोयाबीन तेल १५ दिवसांत प्रतिकिलो २० रुपयांनी महागले.भारतात सूर्यफूल आणि पाम तेलाची मोठी आयात रशिया,युक्रेन,मलेशिया आणि इंडोनिशिया सारख्या देशांतून होते.मात्र,युद्धामुळे जहाजांची ये-जा थांबली असून आयातीवर मर्यादा आल्या आहेत.यामुळे सोयाबीन व सूर्यफूल या तेलांच्या टिनाच्या डब्यामागे १५० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे.तसेच हॉटेल आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या मका व पाम या तेलांच्या आवकीतही घट झाली आहे.आधीच डाळी आणि गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त असलेल्या गृहिणींच्या अडचणीत आता तेलाच्या दरवाढीने भर टाकली आहे.आधीच महागाई शिगेला पोहोचली आहे,त्यात आता फोडणीसाठी लागणारे तेलही महागल्याने महिनाभराचे नियोजन कसे करावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.व्यापाऱ्यांच्या मते,युद्ध स्थिती पुढील दोन आठवड्यात निवळली नाही,तर कच्च्या मालाचा पुरवठा ठप्प होईल.अशा स्थितीत खाद्यतेलाचे दर प्रतिलिटर १५ ते २० रुपयांनी आणखी वाढू शकतात.१५ दिवसांआधी सोयाबीनचे तेल १४६ रुपये किलो होते,तर आता १६६ रुपये प्रति किलो झाले आहे.अश्याच प्रकारे शेंगदाणा १८० वरून १९० रुपये,सूर्यफूल १७० वरून १९०,मोहरी १६० वरून १८०,पाम तेल १४५ वरून १६०,जवस तेल १६५ वरून १८० रुपये तर खोबरेल तेल ४४० वरून ४५० रुपये प्रति किलो झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.
खाद्य तेलाचा भडका; गृहिणींचे बजेट कोलमडले..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

