Wednesday, April 15, 2026
Homeनागपूरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश.. -गडचिरोली,भामरागड,सिरोंचा...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश.. -गडचिरोली,भामरागड,सिरोंचा येथे आपत्ती व्यवस्थापनाच्या चमू सज्ज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-विभागात गेले दोन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.गत दोन दिवस पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणीकरुन तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.प्रसंगी विभागीय आयुक्तांकडून त्यांनी आढावा घेतला.
गडचिरोली,गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात बाघ, वैनगंगा,बावनथडी नद्यांना पूर आला.गोंदिया जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला.या तीन जिल्ह्यातील १०२२ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी प्रशासनाने हलविले आहे.पावसाच्या पाण्यामुळे एकूण ४७ मार्गांवर गतिरोध उत्पन्न झाले असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.यातील सर्वाधिक ३५ ठिकाणे एकट्या गोंदिया जिल्ह्यात आहेत.सध्या पावसाचा जोर कमी झाल्यामुळे हळहळू पाणी ओसरत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्यावर मात करण्यासाठी एसडीआरएफच्या २ तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन चमूंच्या ३ तुकड्या कुठल्याही स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.गडचिरोली,भामरागड,सिरोंचा येथेही आपत्ती व्यवस्थापनाच्या चमू सज्ज आहेत.प्रशासनाला दक्षतेचे निर्देश दिले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!