Saturday, September 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तउद्याला भारत बंदची घोषणा; महत्वाच्या सेवा ठप्प होण्याची शक्यता..

उद्याला भारत बंदची घोषणा; महत्वाच्या सेवा ठप्प होण्याची शक्यता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-केंद्र सरकारने कामगार विरोधी, शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्याचा आरोप करत देशातील प्रमुख १० कामगार संघटनांनी उद्या,बुधवार ९ जुलै रोजी भारत बंदची घोषणा केली आहे.सरकारच्या धोरणांचा फायदा केवळ उद्योगपतींना,त्यांच्या उद्योगांना होणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या नेत्या अमरजीत कौर यांनी म्हटले की, देशभरातून सुमारे २५ कोटी कामगार या आंदोलनात सहभागी होणार असून,शेतकरी आणि ग्रामीण कामगारही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आपला सहभाग नोंदवतील. देशव्यापी संपादरम्यान अनेक अत्यावश्यक सेवा बंद राहू शकतात.त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवरती होण्याची शक्यता आहे. कामगार संघटनांनी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे १७ प्रमुख मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली होती.पण,केंद्र सरकारकडून त्याला कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.त्यामुळे ९ जुलै रोजी भारत बंदची हाक देण्यात आल्याचे कामगार संघटनांनी म्हटले आहे.केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणारी वार्षिक कामगार परिषद गेल्या १० वर्षांपासून घेण्यात आली नाही. त्याचवेळी सरकारने चार कामगार कायदे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.त्यामुळे भविष्यात कामगार संघटना खिळखिळ्या करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे. टपाल,कोळसा खाणी,बँका,विमा,महामार्ग तसेच बांधकाम क्षेत्रातील जवळपास अंदाजे २५ कोटी कामगार आणि कर्मचारी उद्या,बुधवार ९ जुलै रोजी देशभरात संपावर जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.संपामुळे अनेक महत्वाच्या सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी मागितले दोन हजार; लीपिकास ऑफिसमध्येच पकडले एसीबीने..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आरोग्य खात्यातील लीपिकाने शासकीय फी व्यतिरिक्त अतिरिक्त लाचेच्या रकमेची मागणी केल्याप्रकरणी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(ACB) पथकाने सापळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!