- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आरमोरी तालुक्यातील मानापुर (देलनवाडी) येथील रहिवासी इंदिराबाई सहारे यांना रानटी हत्तीच्या हल्ल्यात नुकतेच गंभीर दुखापत झाली होती.सध्या त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे उपचार सुरू आहे.या उपचारादरम्यानच राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी आज,गुरुवार १५ मे रोजी रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देत त्यांच्याशी संवाद साधला आणि आस्थेने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून वनविभागातर्फे नुकसानभरपाई म्हणून ५० हजार रुपयांचा धनादेश दिला.सहारे यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये,यासाठी ॲड.जयस्वाल यांनी वनविभाग व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.वन्य प्राण्यांमुळे झालेल्या हानीबाबत नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित मदत देण्यात यावी.यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन केली जाणार नाही, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.या प्रसंगी आमदार रामदास मसराम यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
- Advertisement -

