- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-रोजगार हमी योजनेअंतर्गत गावातील नागरिकांना गावातच काम मिळू लागल्याने बाहेर ठिकाणी रोजगारासाठी होणाऱ्या भटकंतीचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले आहे.गावातील ग्रामरोजगार सेवक कामाची मागणी करणाऱ्या मजुरांची यादी तयार करून,तालुक्याच्या ठिकाणी जाऊन,पंचायत समितीतील पंचायत स्तर व तहसील कार्यालयातील यंत्रणा स्तरावरून मजुरांचे हजेरी पत्रक काढण्यासाठी वारंवार जायचे; अशातच शासनाने आता बदल करीत
ग्रामपंचायत स्तरावरुनच हजेरीपट(ई-मस्टर)निर्गमित करण्याचे आदेश काढले आहे.
सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यातील ३५ तालुक्यात सदरची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.तर राज्याच्या उर्वरित तालुक्यात लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याने ग्रामरोजगार सेवकांची जबाबदारी वाढणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावरील हजेरीपट प्रचलित पद्धतीप्रमाणे न काढता त्यासाठी ग्रामपंचायतीला प्राधिकृत करणे व ग्रामपंचायत पातळीवरच ई-मस्टर निर्गमित करण्याची कार्यवाही आपले सरकार पोर्टलमार्फत करण्याबाबतची कार्यपद्धती सुरू आहे.त्यामुळे वेळेच्या बचतीसह ‘रोजगार हमीचे काम अन् थोडे दिवस थांब’ यावर आळा घातला जाणार आहे.
- Advertisement -

