- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा होणार? याकडे सर्वजण टक लावून पाहत आहेत.सर्वच पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून हौसे-गवसे आणि नवखे यावेळी आमदार बनू पाहत आहेत. अशातच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आज मंगळवार १५ ऑक्टोंबरला जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.मुख्य निवडणूक आयुक्त दिल्लीत त्यासाठी पत्र परिषद घेतील अशी खात्रीलायक माहिती आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू होईल.राज्य सरकारला कोणतेही निर्णय आचारसंहितेच्या काळात घेता येणार नाहीत.
यावेळी निवडणूक एका टप्प्यात होणार की दोन, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.२०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक आचारसंहिता ही २१ सप्टेंबर रोजी जाहीर झाली होती आणि २१ ऑक्टोंबरला मतदान झाले होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रपरिषद आज मंगळवारी दुपारी मुंबईत होणार आहे.महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ते जाहीर करतील,अशी शक्यता आहे.तिन्ही पक्षांच्या एकत्रित निवडणूक रणनीतीबद्दल हे नेते काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे.
- Advertisement -

