Monday, July 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त...अन्यथा पीएम किसान योजनेचे दोन हजार विसरा..!

…अन्यथा पीएम किसान योजनेचे दोन हजार विसरा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी समान तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आणि आधार व्हेरिफिकेशन आवश्यक होते.मात्र,आता केंद्र सरकारने ‘फार्मर आयडी’ म्हणजेच शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करून नवा नियम लागू केला आहे. गेल्या काही वर्षांत पीएम किसान योजनेचा लाभ लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतांना काही ठिकाणी गंभीर गैरप्रकार आढळले.चुकीची नोंदणी,चुकीची कागदपत्रे, बँक खात्यातील त्रुटी आणि बोगस लाभार्थी यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले.काही प्रकरणात तर शेतकरी नसलेली माणसेही योजनेचा हप्ता घेत असल्याचे समोर आले.त्यामुळे या त्रुटी दूर करण्यासाठी ‘फार्मर आयडी’ हा मुख्य उपाय म्हणून सरकारने पुढे आणला आहे.यामुळे योजना अधिक पारदर्शक होणार असून बनावट लाभार्थ्यांवर मोठी कारवाई होणार आहे. त्यामुळे ‘फार्मर आयडी’ नोंदविल्याशिवाय आगामी हप्ते बँक खात्यात जमा होणार नाहीत.म्हणजेच ज्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही,त्यांना लवकरात लवकर आयडी बनवावी लागेल.आतापर्यंत पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हप्ते जमा करण्यात आले आहेत.तत्पूर्वी  २२ व्या हप्त्यापूर्वी ही नवीन अट लागू होत आहे.फार्मर आयडी लागू झाल्यानंतर शेतकरी थेट डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडला जाईल.त्याला त्याच्या नावावर कोणत्या योजना चालू आहेत,किती अनुदान मिळाले आहे,विमा किती मिळाला,पीक कर्जाची स्थिती काय आहे,याची माहिती एका क्लिकवर समजू शकेल. त्यामुळे त्याची फसवणूक होणार नाही आणि कोणतीही रक्कम चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात जाण्याचा धोका कमी होईल.पीएम किसान योजनेत ‘फार्मर आयडी’ अनिवार्य केल्याने केंद्र सरकारने बोगस लाभार्थ्यांना एकप्रकारे मोठा झटका दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!