- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.या संकेतस्थळाची माहिती अद्याप शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली नाही.अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी व्हावी,यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून येत्या १९ मे रोजी संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे.अशातच आता अकरावी प्रवेशाच्या नावाने बनावट प्रवेशाची संख्येतस्थळ निदर्शनास येऊ लागली आहे.दहावीचा निकाल जाहीर झाला नसला तरी लाखो विद्यार्थी या संकेतस्थळाला भेट देऊन अकरावी प्रवेशासंदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.यातून विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊन त्यांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यामुळे शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात निर्णय घेवून अशा संकेतस्थळावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.मुंबई,पुणे-पिंपरी चिंचवड,नागपूर,नाशिक,अमरावती आणि छत्रपती संभाजी नगर या सहा महानगरपालिका क्षेत्रामधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती.आता सर्वच राज्यात प्रवेश ऑनलाइन होणार असल्याने दहावीच्या परीक्षेला बसलेले जवळपास १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यासाठी बनावट संकेतस्थळाला भेट देण्याची शक्यता आहे.त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
- Advertisement -