Saturday, March 15, 2025
Homeतामिळनाडूसाप पकडणाऱ्यांना 'पद्मश्री' साठी फोन येतो तेव्हा ...
spot_img


साप पकडणाऱ्यांना ‘पद्मश्री’ साठी फोन येतो तेव्हा …

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

ऑनलाईन डेस्क उद्रेक न्युज वृत्त

तामिळनाडू :-प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंधेला केंद्र सरकारकडून ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा तामिळनाडू मधील साप पकडणाऱ्या दोघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेले हे साप पकडणारे दोन्ही अवलिया तामिळनाडू मधील इरुला या आदिवासी जमातीतून येतात.मासी सदाइयान आणि वैदिवेल गोपाल अशी या दोघांची नावे आहेत. जेव्हा पुरस्कार घोषित झाल्याचा फोन या दोघांना आला तेव्हा हे दोघे साप पकडत होते. यांनी फोन उचलला आणि त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. तेव्हा या दोघांनी एक मिनिट थांबत दिर्घ श्वास घेतला, एकमेकांकडे पाहिले आणि गालातल्या गालात हसत पुन्हा साप पकडण्याच्या मागे लागले.

आदिवासी जमातीतील इरुला हे लोक तामिळनाडूच्या देनाकनिकोट्टईच्या जवळील जंगल परिसरात राहतात. त्यांना कन्नड भाषा सुद्धा चांगल्यापद्धतीने बोलता येते. हे लोक उंदीर आणि साप पकडण्यात अत्यंत कुशल आणि तरबेज आहेत.

२०१७ मध्ये अमेरिका अजगरांच्या त्रासाने वैतागली होती. अमेरिकेतील जंगलातील बर्मन जातीचे अजगरे पकडण्यासाठी अमेरिकेने थेट मासी सदाइयान आणि वैदिवेल गोपाल या जोडीलाच साद घातली. तेव्हा ही साप पकडणारी जोडी प्रथम प्रकाश झोतात आली होती.अजगर पकडण्यासाठी या दोघांना अमेरिकेने ४४ लाख रुपये दिले होते.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!