- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-खरीप हंगाम २०२५ साठी शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत,तर सहाय्यक स्तरावरील ई- पीक पाहणी १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार होती.मात्र,ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांना शेतात जाऊन पिकांची नोंदणी करता आली नाही. तसेच काही शेतकऱ्यांनी आधी पेरलेल्या पिकांची नोंदणी केली.मात्र,अतिवृष्टीने पिकांची नासाडी झाली. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.परिणामी ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती.त्यानुसार पिकांच्या नोंदणीसाठी अतिरिक्त मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांसाठी २० सप्टेंबर पर्यंत ई-पीक पाहणीची मुदतवाढ देण्यात आली आहे,तर २१ सप्टेंबर ते ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत गावातील सहाय्यक ई-पीक पाहणी नोंदणी करून देणार आहेत.
- Advertisement -

