Tuesday, April 21, 2026
Homeगडचिरोलीशेतकरी बांधव मेटाकुटीस; वीजबिल भरणा करावा की कर्जफेड करावी?

शेतकरी बांधव मेटाकुटीस; वीजबिल भरणा करावा की कर्जफेड करावी?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- सध्याच्या घडीला शेतकरी बांधवांपुढे मोठे अस्मानी संकट निर्माण झाले आहे.अशातच इकडे आड तिकडे विहीर काहीशी अशीच स्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे. नेहमीच्या कीट-किटीने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.मार्च एंडिंगच्या तडाख्यात शेतीसाठी उचल केलेल्या कर्जाची परतफेड तर आवाक्याबाहेरचे घरगुती व कृषिपंपाचे वीज बिल अशी दुधारी तलवार सध्या शेतकऱ्याच्या मानगुटीवर कायम आहे.त्यामुळे कर्जाची परतफेड करायची की वीजबिल भरायचे? असा दुहेरी प्रश्न शेतकऱ्यांपुढे आवासून उभा आहे. बहुतांश शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीला कर्ज घेऊन आपल्या शेतमशागतीच्या कामाला लागतात. आपल्या शेतातून अधिकाधिक उत्पन्न व काढून कर्जाची परतफेड करून वर्षभर कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी शेतकरी शेतात जीव वे पणाला लावून राबतो.मात्र,मागील हंगामापासून शेतकऱ्यांपुढे मोठे आवाहनच उभे झाले.कोरोना लॉकडाऊन काळात मजूरांची वानवा त्यातही अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने उत्पादनात घट या सर्व विवंचनेतून शेतकरी उठण्याच्या प्रयत्नात असतांना आता सुलतानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले. एकीकडे ऐन तोंडावर येऊन ठेपलेल्या मार्च एंडिंगच्या तडाख्यात बँकांकडून शेतकऱ्यांनी उचल केलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा लावला जात असताना दुसरीकडे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना घरगुती व कृषिपंपाचे वीज बिल तत्काळ भरा; अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्यासंबंधाने बजावले जात आहे.अशा आर्थिक अडचणीच्या प्रसंगी शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करायची? की आवाक्याबाहेरचे घरगुती व कृषिपंपाचे वीज बिल भरायचे? की वर्षभर कुटुंबाचे गुजराण करायचे? असा मोठे केविलवाणा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा येऊन ठाकला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

दिव्यांगांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करुन एकाच छताखाली विविध शासकिय योजनांचा लाभ घ्यावा.. -देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण, पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी स्वतंत्रपणे कार्य करण्याच्या उद्देशाने दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना १५ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली.स्वतंत्र विभाग स्थापन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!