उद्रेक न्युज वृत्त :-ग्रामीण तसेच शहरी भागात काही महिला वा पुरुष वर्गांकडून कुठला तरी आधार घेऊन टोमणे मारण्याचा म्हणजेच टोचून बोलणे किंवा एखादा आधार घेऊन तिरकस बोलण्याचा प्रयत्न केला जातो.त्यातच घरातील एखाद्या स्त्रीला मुल बाळ होत नसेल तर टोमणे मारणे वेगळेच असते.असाच प्रकार एका कुटुंबात घडल्याने महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.मात्र,सदर महिलेस आई होऊ न शकल्याबद्दल पतीच्या बहिणींनी त्यांच्या वहिनीला टोमणे मारणे म्हणजे क्रूरता नाही,असे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे.भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ किंवा हुंडा प्रतिबंधक कायदा,१९६१ च्या कलम ३ आणि ४ अंतर्गत खटला चालू ठेवण्यासाठी हे पुरेसे कारण मानले जाऊ शकत नाही.महिलेची याचिका फेटाळतांना न्यायमूर्ती हरिनाथ एन म्हणाले की,आरोपी याचिकाकर्त्याच्या घरापासून दूर राहत होता.त्यामुळे मुल-बाळ होत नसल्याने टोमणा मारणे हे क्रूरता कसे ठरू शकते? त्यानुसार उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली.
वहिनीला टोमणे मारणे म्हणजे क्रूरता नाही- उच्च न्यायालय
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

