Wednesday, August 12, 2026
Homeमुंबईराज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यपाल पदाची घेतली शपथ 

राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यपाल पदाची घेतली शपथ 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यपालपदाची शपथ घेतली आहे.राजभवनामधील दरबार हॉलमध्ये आज शनिवारी शपथविधी सोहळा पार पडला.मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना पदाची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. तर,राज्यपालपदावरून निवृत्त होत असलेले भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे गुरुवारी राजभवन येथे निरोप देण्यात आला.रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल बनले आहेत.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत टीकेचे धनी बनलेल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यानुसार १२ फेब्रुवारीला भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यानंतर लगेचच रमेश बैस यांच्या नावाची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून जाहीर घोषणा करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश दुर्घटनेनंतर प्रशासनाची कठोर कारवाई; मुख्याध्यापक व दोन वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल.. – आश्रमशाळा बंद करण्याची शासनाकडे शिफारस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेची जिल्हा प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाने गंभीर...

२० हजाराची लाच घेतांना वनक्षेत्र सहाय्यक अडकला एसीबीच्या जाळ्यात; तर उपस्थित दोन वनरक्षकही ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्राच्या राजुली सहवन क्षेत्रांतर्गत येणाऱ्या परसटोला येथील राउंड ऑफिसमध्ये गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)पथकाने २० हजाराची...

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!