Thursday, April 16, 2026
Homeमुंबईराज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यपाल पदाची घेतली शपथ 

राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यपाल पदाची घेतली शपथ 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यपालपदाची शपथ घेतली आहे.राजभवनामधील दरबार हॉलमध्ये आज शनिवारी शपथविधी सोहळा पार पडला.मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना पदाची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. तर,राज्यपालपदावरून निवृत्त होत असलेले भगतसिंह कोश्यारी यांना राजभवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे गुरुवारी राजभवन येथे निरोप देण्यात आला.रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल बनले आहेत.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत टीकेचे धनी बनलेल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.त्यानुसार १२ फेब्रुवारीला भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यानंतर लगेचच रमेश बैस यांच्या नावाची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून जाहीर घोषणा करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!