Monday, May 18, 2026
Homeगडचिरोलीमाहिती अधिकारातील अपिलीय अधिकारी कर्मचाऱ्यांचीच घेतात बाजू....- राज्य माहिती आयोगाकडे RTI कार्यकर्ते...

माहिती अधिकारातील अपिलीय अधिकारी कर्मचाऱ्यांचीच घेतात बाजू….- राज्य माहिती आयोगाकडे RTI कार्यकर्ते करणार तक्रार दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

सत्यवान रामटेके/ संपादक

गडचिरोली :- प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणांच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने,सार्वजनिक  प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील सार्वजनिक हिताची माहिती नागरिकांना मिळविता यावी; यासाठी माहिती अधिकार अधिनियम १२ ऑक्टोंबर २००५ रोजी सर्वत्र अमलांत आणला गेला.यानुसार माहिती अधिकार अर्ज कलम ३ अन्वये जोडत्र ‘अ’  नागरिकांद्वारे एखाद्या वा काही कार्यालयास दाखल करुनही ३० दिवसांत माहिती दिली जात नाही.जोडपत्र ‘अ’ नुसार संबंधित कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी जनमाहिती अधिकारी म्हणून गणला जातो.संबंधित कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी माहिती अधिकार अर्जाद्वारे एखादी माहिती मागितल्या नंतरही वेगवेगळी कारणे दाखवून व भूलथापा देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करतांना सर्वत्र दिसून येत आहेत.३० दिवसांत माहिती न मिळाल्याने पुढील ३० दिवसांच्या आत दुसरे अपील म्हणजे जोडपत्र ‘ब’ कलम १९(१) अन्वये नियम ५(१) नुसार दाखल केली जातात व काही दिवसांत  अपिलीय अधिकारी अर्जदार व संबंधित कार्यालयातील जनमाहिती अधिकारी यांना तारीख ठरवून सुनावणी घेत असतात.काहीजण सुनावणीच घेत नाही तर सुनावणी घेणारे अपिलीय अधिकारी व जनमाहिती अधिकारी एकाच कार्यालयाशी निगडित असल्याने माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागणाऱ्यांची बाजू न घेता कर्मचाऱ्यांचीच बाजू घेऊन निर्णय देण्याचे काम हल्ली माहिती अधिकारात सुरू आहे.३० दिवसांत माहिती न दिल्यास अर्जदारास मागितलेली माहिती विनामूल्य मोफत देणे बंधनकारक आहे.मात्र काही जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी राज्य माहिती आयोगाचे शासन परिपत्रक २०१६/प्र.क्र.(१७८/१६)सहा.दिनांक-१ फेब्रुवारी २०१७ चा संदर्भ देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.सदर शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सूचनांचे पालन किती अधिकारी,कर्मचारी करीत आहेत? केवळ काही नियम सांगून व त्यातील महत्वाचे नियम धाब्यावर बसवून माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने व सुनावणीच्या वेळेस माहिती अधिकारातील अपिलीय अधिकारी कर्मचाऱ्यांचीच  बाजू घेत असल्याने; याची तक्रार राज्य माहिती आयोगाकडे करण्यात येणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!