Friday, November 7, 2025
Homeगडचिरोलीमाहिती अधिकारातील अपिलीय अधिकारी कर्मचाऱ्यांचीच घेतात बाजू....- राज्य माहिती आयोगाकडे RTI कार्यकर्ते...

माहिती अधिकारातील अपिलीय अधिकारी कर्मचाऱ्यांचीच घेतात बाजू….- राज्य माहिती आयोगाकडे RTI कार्यकर्ते करणार तक्रार दाखल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

सत्यवान रामटेके/ संपादक

गडचिरोली :- प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणांच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने,सार्वजनिक  प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील सार्वजनिक हिताची माहिती नागरिकांना मिळविता यावी; यासाठी माहिती अधिकार अधिनियम १२ ऑक्टोंबर २००५ रोजी सर्वत्र अमलांत आणला गेला.यानुसार माहिती अधिकार अर्ज कलम ३ अन्वये जोडत्र ‘अ’  नागरिकांद्वारे एखाद्या वा काही कार्यालयास दाखल करुनही ३० दिवसांत माहिती दिली जात नाही.जोडपत्र ‘अ’ नुसार संबंधित कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी जनमाहिती अधिकारी म्हणून गणला जातो.संबंधित कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी माहिती अधिकार अर्जाद्वारे एखादी माहिती मागितल्या नंतरही वेगवेगळी कारणे दाखवून व भूलथापा देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करतांना सर्वत्र दिसून येत आहेत.३० दिवसांत माहिती न मिळाल्याने पुढील ३० दिवसांच्या आत दुसरे अपील म्हणजे जोडपत्र ‘ब’ कलम १९(१) अन्वये नियम ५(१) नुसार दाखल केली जातात व काही दिवसांत  अपिलीय अधिकारी अर्जदार व संबंधित कार्यालयातील जनमाहिती अधिकारी यांना तारीख ठरवून सुनावणी घेत असतात.काहीजण सुनावणीच घेत नाही तर सुनावणी घेणारे अपिलीय अधिकारी व जनमाहिती अधिकारी एकाच कार्यालयाशी निगडित असल्याने माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागणाऱ्यांची बाजू न घेता कर्मचाऱ्यांचीच बाजू घेऊन निर्णय देण्याचे काम हल्ली माहिती अधिकारात सुरू आहे.३० दिवसांत माहिती न दिल्यास अर्जदारास मागितलेली माहिती विनामूल्य मोफत देणे बंधनकारक आहे.मात्र काही जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी राज्य माहिती आयोगाचे शासन परिपत्रक २०१६/प्र.क्र.(१७८/१६)सहा.दिनांक-१ फेब्रुवारी २०१७ चा संदर्भ देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.सदर शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सूचनांचे पालन किती अधिकारी,कर्मचारी करीत आहेत? केवळ काही नियम सांगून व त्यातील महत्वाचे नियम धाब्यावर बसवून माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने व सुनावणीच्या वेळेस माहिती अधिकारातील अपिलीय अधिकारी कर्मचाऱ्यांचीच  बाजू घेत असल्याने; याची तक्रार राज्य माहिती आयोगाकडे करण्यात येणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल १ हजार ९७२ शाळांमध्ये निनादले ‘वंदे मातरम्’ चे सूर अन् देशभक्तीची लहर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा असलेल्या “वंदे मातरम्” या गीताला आज १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.जिल्ह्यातील सर्व...

ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘दे धक्का’.. – आजच पक्ष प्रवेश अन् आजच नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही घोषित..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वप्रथम नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२...

आज सोने-चांदीच्या दरात घसरण; पण अजूनही लाख मोलाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-सोन्या-चांदीचे दर हे दिवसातून दोनदा जारी करण्यात येतात.त्यामुळे दुपारी वाढलेला भाव पटकन सायंकाळच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात झालेला दिसून येत असल्याने अनेकजण...

देसाईगंज येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारताच्या स्वातंत्र्य काळात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या बंकिमचंद्र चटर्जी लिखित गीत 'वंदे मातरम' ला आज,शुक्रवार ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!