- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मंगळवारी म्हणजेच उद्यापासून सुरुवात होणार आहे.तत्पूर्वी विविध पक्षांच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे.काल,रविवारी भाजपाच्या वतीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. मात्र,महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायमच आहे.अशातच महाविकास आघाडीत अंतिम १७ जागांवर चर्चा सुरू आहे. उद्यापर्यंत जागा वाटपाची चर्चा संपेल.तसेच आमचा ठाकरे गटासोबत ४ ते ५ जागांवर वाद सुरू असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.तीन पक्ष आहेत. तीन पक्षांमध्ये आघाडीमधून लढताना काही प्रमाणात नाराजीला सामोरे जावे लागते.नाराज कार्यकर्त्यांची आम्ही समजूत काढू आणि महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाऊ,असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
जागावाटपात कोणत्या भागात कुणाला कोणती जागा सुटली,याबाबत हायकमांडशी चर्चा केली आहे. काँग्रेसच्या वाट्याला कोणत्या जागा मिळाल्या याबाबत मल्लिकार्जुन खर्गे आणि वेन्युगोपाळ यांच्याशी चर्चा केली.काही जागांवर पेच निर्माण झाला होता; त्यावर काय मार्ग काढावा याबाबतही हायकमांडशी चर्चा केल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. आज संध्याकाळी किंवा उद्या पहिली यादी जाहीर होईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली.
- Advertisement -

