Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीमहाकाली महोत्सवात "गोंडवानाचा महायोध्दा" क्रांतिवीर बाबूराव शेडमाके नाटकाचे आयोजन. ..

महाकाली महोत्सवात “गोंडवानाचा महायोध्दा” क्रांतिवीर बाबूराव शेडमाके नाटकाचे आयोजन. ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- गोंडवानाच्या स्वातंत्र्यासाठी जिवाचे रान करुन वयाच्या २५ व्या वर्षी शहीद झालेल्या चांदागडच्या सुपुत्राची,आदिवासी गोंडराजाची शौर्यगाथा असलेल्या “गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके” नाटकाचा प्रयोग दि.२१ ऑक्टोंबर २०२३ ला दु.२ वा.चंद्रपूर येथील महाकाली महोत्सवात भव्य दिव्य स्वरुपात सादर होत असून रसिक प्रेक्षक मोठ्या उत्साहाने नाटकाच्या प्रयोगाची वाट पाहत आहेत.झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपूरे यांनी सदर नाटकाचे लेखन केले असून,प्रसिद्ध गायक,दिग्दर्शक व निर्माता अनिरुद्ध वनकर यांनी त्यांच्या लोकजागृती संस्था,चंद्रपूर च्या वतीने या नाटकाची निर्मिती केली आहे.

सिनेस्टार मुन्ना बिके,निखिल मानकर,राजरत्न पेटकर,  संजीव रामटेके,सुरज चौधरी,गुरू मोहूर्ले,अविनाश कडूकर,अमित दुर्गे,यश शेंडे,वेदांत मेहता,अंकुश शेडमाके,भाष्कर मडावी,शुभम गुरनुले,गणेश मडावी, मयुर मस्के,अनुराग मुळे,स्नेहल वाडगुरे इ.पुरुष कलावंत आणि करिश्मा मेश्राम,रुपाली खोब्रागडे, नयना खोब्रागडे,प्रियंका सिडाम,माधुरी ढोरे,मनिषा बावणे,प्रविण लाडवे,संजना येलेकर,राजश्री,स्मिता, भावना इत्यादी स्त्री कलावंतांसह नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा,नवी दिल्ली यांचे “नाट्य प्रशिक्षण शाळेत” प्रशिक्षीत ३५ कलावंत भुमिका करीत आहेत.रेला नृत्य,आकर्षक प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत या नाटकाचे खास आकर्षण आहे.प्रत्यक्ष रंगमंचावर साकारणारे क्रांतियुध्द अंगावर रोमांच उभे करणारे असल्याने याचा लाभ घेण्यात यावा; अशी मागणी करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!