उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- बालविवाहाला आळा बसावा, बालकांसोबत अनुचित प्रकार घडू नये,बालकांचे हित जोपासून कुटुंब सुरक्षित राहावे,याकरिता बालविवाह कायद्या तयार करण्यात आला.बालविवाहाचे दुष्परिणाम व कायद्याचे उल्लंघन केल्यास येणाऱ्या अडचणी,बालिकेचे होणारे शिक्षणाचे,भविष्याचे व आरोग्याचे नुकसान,मुली कुटुंबामध्ये जास्त दिवस राहिल्याने वाढणारा गैरसमज दूर करून बालविवाह कसा टाळता येईल.कोणीही याकरिता बळी पडणार नाही.बालिका,कुटुंब व समाज या सर्व घटकांचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे.
बालविवाह पद्धतीला प्रतिबंध पाळण्याकरिता सामूहिकरीत्या संकल्प करणेही गरजेचे आहे.जिल्ह्यात बालविवाह होत असल्याचे समजल्यास तात्काळ बालकल्याण समिती गडचिरोली,जिल्हा बालसंरक्षण कक्ष गडचिरोलीच्या विभागांना कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

