- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ अरबी समुद्रातील एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी निलकमल बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याने प्रवासी बोटचे दोन तुकडे होऊन,निलकमल बोटीला झालेल्या दुघर्टनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून दुर्घटेत मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाखाची मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी शासनाच्या वतीने केली जाईल असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की,सायंकाळी ७ वाजे पर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून यामध्ये १० प्रवासी नागरिक असून तीन नौदलाचे जवान आहेत.शासनाच्या सर्व यंत्रणा याकामी लागल्या असून नौदल आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य हाती घेऊन १०१ प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे.अजूनही बचावकार्य सुरू असून नौदलाच्या चार हेलिकॉप्टरची मदत घेतली गेली असल्याचीही माहिती मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली.
- Advertisement -

