Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी दोन ग्रामस्थांची गळा चिरून केली हत्या..!

पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी दोन ग्रामस्थांची गळा चिरून केली हत्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-सुरक्षा दलांच्या धडक कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले आहेत.जंगल तसेच परिसरातील गावांमध्ये नक्षलवाद्यांना आश्रय घेणे कठीण झाले आहे.पुढील काळात नक्षलवाद्यांचा सुकडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही.आपला अंत आता निकट येऊ लागला आहे,असे नक्षलवाद्यांना वाटू लागल्याने निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. संतापलेल्या नक्षलवाद्यांनी भ्याड कृत्य केल्याची घटना छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. काल मंगळवारच्या रात्री सुकमा जिल्ह्याच्या केरळपाल पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिरसेट्टी पंचायतीच्या नंदापारा गावातील दोन ग्रामस्थांना झोपेतून उठवत घरातून उचलून दूरवर जंगल परिसरात नेले व तुम्ही मोबाईलवरून पोलिसांना माहिती देता,असे म्हणून दोघांचाही धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली.देवेंद्र पदमी आणि पोज्जा पदमी असे हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.त्यातच पोलिसांचे खाबरी असल्याच्या संशयावरून दोन गावकऱ्यांनाही मारहाण केली. दोघांच्याही पायांना आणि पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.प्रकरणी पोलिसांना घटनेची माहिती होताच घटनास्थळावरून नक्षलवाद्यांचे पत्रक आढळून आले. त्यात त्यांनी लिहिले की,१० एप्रिल रोजी त्याने पोलिसांना माहिती देऊन आमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला.तो २०२२ मध्ये खबऱ्या म्हणून काम करत आहे.यासोबतच त्याच्यासारख्या खबऱ्यांना आणि लोकविरोधी काम करणाऱ्यांना अशी मृत्युदंडाची शिक्षा मिळेल,असे लिहिले आहे.नक्षलवाद्यांच्या कृत्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!