Monday, January 19, 2026
Homeएटापल्लीपुन्नूर येथील पाण्याची समस्या मिटणार... -भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते नळ पाणी पुरवठा...

पुन्नूर येथील पाण्याची समस्या मिटणार… -भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते नळ पाणी पुरवठा कामाचे भूमिपूजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

एटापल्ली:- तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या पुन्नूर गावात पाण्याची समस्या मिटणार असून नुकतेच माजी जि.प.अध्यक्षा तथा सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते जल जीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी माजी सभापती बेबीताई नरोटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे एटापल्ली शहर अध्यक्षा पौर्णिमा श्रीरामवर,सचिव सुमन दुर्वा,येमली चे सरपंच ललिता मडावी,माजी नगरसेविका सगुणा कांदो, सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच पुन्नूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व  जीवनमान उंचाविण्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे.या मिशन अंतर्गत दुर्गम भागातील पुन्नूर येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर असून या निधीतून पाईपलाईन,विहीर खोलीकरण,नवीन जलकुंभ बांधकाम व गावांतर्गत नव्याने पाईपलाईन करणे नळ कनेक्शन देणे इत्यादी कामे केली जाणार आहे.

पुन्नूर हे गाव कसनसूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असून याठिकाणी ४३ लाख ६४ हजार ३५९ रुपयांच्या निधीतून नळ पाणीपुरवठा योजनेचे काम होत असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामासाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह.. – डोक्यावर व शरीरावर गंभीर जखमा; तर हाताचे बोट छाटलेले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एक दिवसापूर्वी कामासाठी घराबाहेर पडलेल्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना अहेरी तालुक्याच्या आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावरील...

पुढील वित्तीय वर्षासाठी ३७१ कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील सर्व विभागांनी केवळ लोकसंख्येच्या आधारावर नव्हे,तर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार,दुर्गमता,दळणवळणाची परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन पुढील पाच वर्षांचा समन्वित मास्टर...

उद्याला राज्याचे मुख्य सचिव गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे उद्या,मंगळवार २० व २१ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात...

तक्रारदार केवळ मागासवर्गीय आहे म्हणून गुन्हा सिद्ध होत नाही.. -अपमान करण्यामागे त्या व्यक्तीला जातीवरून नीचा दाखवण्याचा हेतू असणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-काहीजण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक)कायद्याचा धाक दाखवून अनेकांना कायद्याच्या कचाट्यात गोवण्याचा प्रयत्न करीत असतात.पण,कायदा हा सर्वांसाठी समान आहे.नाहक ठोस पुराव्याअभावी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!