Tuesday, April 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपनीर विक्रीच्या नावाने ग्राहकांची फसवणूक; केंद्र सरकारकडून दखल..

पनीर विक्रीच्या नावाने ग्राहकांची फसवणूक; केंद्र सरकारकडून दखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पनीरला बाजारात मोठी मागणी असते.विशेषतः लहान मुलांना सर्वात जास्त पनीर खायला आवडते.मात्र,काही ठिकाणी बनावट पनीर अथवा ‘चीज ॲनॅलॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून आल्याने महाराष्ट्रानंतर आता केंद्र सरकारने ‘आर्टिफिशियल पनीर’ म्हणजेच चीज ॲनॅलॉगवर मोठा निर्णय घेतला आहे.फुड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी ऑफ इंडियाच्या(एफएसएसएआय) नियमांनुसार हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त पर्याय विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.पुढील महिन्याच्या १ मेपासून या नियमांची अंमलबजावणी होणार असून ग्राहकांची फसवणूक रोखण्यावर भर दिला जाणार आहे.अन्न सुरक्षा आणि मानके(लेबलिंग व डिस्प्ले नियमन)२०२० च्या नियमांनुसार,विक्री होणाऱ्या अन्नपदार्थातील सर्व घटक व पोषणमूल्यांची माहिती रेस्टॉरंट,हॉटेल,कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्ड्स,डिस्प्ले बोर्ड्स आणि ऑर्डर मशीनवर अचूक माहिती देणे अनिवार्य आहे.
विशेष म्हणजे,पनीर फक्त दूध फाडून बनवले जाते.तर चीज ॲनॅलॉगमध्ये पाम तेल,स्टार्च आणि दुधाचे घन पदार्थ वापरले जातात.पनीरमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन आणि कॅल्शियम असते.तर चीज ॲनॅलॉगमध्ये प्रथिने कमी आणि अनहेल्दी फॅट्स जास्त असतात.खरे पनीर मऊ आणि सहज तुटणारे असते.तर चीज ॲनॅलॉग रबरासारखे,चिवट आणि थोडे तेलकट असते.चीज अनॅलॉग हे खऱ्या पनीरच्या तुलनेत खूप स्वस्त असते.चीज अनॅलॉग दीडशे ते दोनशे,अडीचशे रुपये किलो दराने मिळते.तर पनीरचा दर साडे तीनशे ते चारशे रुपये किलो आहे.वनस्पती तेल आणि दूध किंवा दुधाची भुकटी एकत्र करून तयार होणाऱ्या चीज ॲनालॉगचा पनीर म्हणून आहारात समावेश केला जातो. चीज ॲनॅलॉग खाल्ल्याने मेद वाढणे,कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यासह पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. पनीरऐवजी पर्यायी पदार्थ म्हणून चीज अनॅलॉग वापरणे ही एका अर्थाने ग्राहकांची फसणवूक आहे.त्यामुळे, विधीमंडळ अधिवेशनात भाजपचे विक्रमसिंह पाचपुते यांनी आर्टिफिशियल पनीरचा मुद्दा मांडला होता. त्यानुसार,आता १ मे पासून पनीर ऐवजी चीज ॲनॅलॉग म्हणून मेनू कार्डमध्ये बदल करावा लागणार आहे.मेनू कार्डमध्ये बदल न केल्यास एफडीए आणि एफएसएसएआयकडून कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना देखील पनीर खातांना ते आर्टिफिशियल पनीरसारखे लागले,तर त्यांनी तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले जात आहे.यामुळे,शुद्ध पनीर विक्रीच्या नावाने होणारी ग्राहकांची फसवणूक टाळली जाऊ शकते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!