Monday, August 17, 2026
Homeगडचिरोलीनिराधारांसाठी आधार असणारेच झाले निराधार...!- तीन महिन्यांपासून रखडले मानधन....- संजय गांधी निराधार...

निराधारांसाठी आधार असणारेच झाले निराधार…!- तीन महिन्यांपासून रखडले मानधन….- संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट १ मे पासून जाणार बेमुदत संपावर ….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- जिल्ह्यातील वृध्दांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांचे गेले तीन महिन्यांपासून मानधन रखडले आहेत.अशातच मानधना बाबत व इतर समस्यांचे शासन स्तरावरील महोदयांकडे निवेदने आणि आपबिती सांगूनही अक्षम्यपणे दुर्लक्ष केले जात असल्याने ‘निराधारांसाठी आधार असणारेच झाले निराधार’ त्यामुळे १ मे २०२३ पासून महाराष्ट्रातील संपूर्ण संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत संप पुकारला आहे.बेमुदत पुकारलेल्या संपात गडचिरोली जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांचाही सहभाग असणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी संगायो विभाग गडचिरोली यांना सादर करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलमध्ये संजय गांधी निराधार योजने अंतर्गत वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना,कुटुंब आर्थिक सहाय्य लाभार्थी योजना व इतर वरिष्ठांनी सांगितलेली अशी अनेक कामे आय टी असिस्टंट यांना करावी लागतात. अशातही ‘बिन पगारी व फुल्ल अधिकारी’ बनविणे कितपत योग्य आहे.अनेक वर्षांपासून निराधारांसाठी आधार असलेले आय टी असिस्टंट तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत.याच भरवशावर अनेकांची कुटुंबे सुरू होऊन व परिवार वाढीस लागून,अहोरात्र काम करून,संसाराचा गाढा हाकण्यास कसे-बसे चालढकल करून जीवन जगीत आहेत.अशातही मानधन रखडले जात असेल तर याला काय म्हणावे?झोपलेल्या प्रशासनास कितीवेळा जागे करायचे? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

‘नियमित कर्मचारी तुपाशी आणि मानधन वा कंत्राटी कर्मचारी उपाशी’ अशी हल्ली परिस्थिती निर्माण झाली आहे.नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचारी वर्गांकडून शासकीय कामे सर्वात जास्त करवून घेतली जात आहेत.त्यामुळेच शासन तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी कर्मचारी वर्गांची भरती करतांना दिसून येत आहे.कंत्राटी कर्मचारी वर्गांची भरती करण्यात तर येत आहे;मात्र समान काम समान वेतनही लागू करणे तितकेच महत्त्वाचे आहे.यासाठी कित्तेक वर्षांपासून  संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट लढा देत आहेत.मात्र शासन स्तरावरून कुणी आधारच देईना..! यासाठी १ मे २०२३ पासून महाराष्ट्रातील संपूर्ण संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत संपावर जाणार असून गडचिरोली जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांचा बेमुदत संपात सहभाग असणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!