Thursday, January 22, 2026
Homeगडचिरोलीनिराधारांसाठी आधार असणारेच झाले निराधार...!- तीन महिन्यांपासून रखडले मानधन....- संजय गांधी निराधार...

निराधारांसाठी आधार असणारेच झाले निराधार…!- तीन महिन्यांपासून रखडले मानधन….- संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट १ मे पासून जाणार बेमुदत संपावर ….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- जिल्ह्यातील वृध्दांसाठी अहोरात्र काम करणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांचे गेले तीन महिन्यांपासून मानधन रखडले आहेत.अशातच मानधना बाबत व इतर समस्यांचे शासन स्तरावरील महोदयांकडे निवेदने आणि आपबिती सांगूनही अक्षम्यपणे दुर्लक्ष केले जात असल्याने ‘निराधारांसाठी आधार असणारेच झाले निराधार’ त्यामुळे १ मे २०२३ पासून महाराष्ट्रातील संपूर्ण संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत संप पुकारला आहे.बेमुदत पुकारलेल्या संपात गडचिरोली जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांचाही सहभाग असणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी संगायो विभाग गडचिरोली यांना सादर करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलमध्ये संजय गांधी निराधार योजने अंतर्गत वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना,कुटुंब आर्थिक सहाय्य लाभार्थी योजना व इतर वरिष्ठांनी सांगितलेली अशी अनेक कामे आय टी असिस्टंट यांना करावी लागतात. अशातही ‘बिन पगारी व फुल्ल अधिकारी’ बनविणे कितपत योग्य आहे.अनेक वर्षांपासून निराधारांसाठी आधार असलेले आय टी असिस्टंट तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत.याच भरवशावर अनेकांची कुटुंबे सुरू होऊन व परिवार वाढीस लागून,अहोरात्र काम करून,संसाराचा गाढा हाकण्यास कसे-बसे चालढकल करून जीवन जगीत आहेत.अशातही मानधन रखडले जात असेल तर याला काय म्हणावे?झोपलेल्या प्रशासनास कितीवेळा जागे करायचे? असा सवाल उपस्थित केला जातो आहे.

‘नियमित कर्मचारी तुपाशी आणि मानधन वा कंत्राटी कर्मचारी उपाशी’ अशी हल्ली परिस्थिती निर्माण झाली आहे.नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचारी वर्गांकडून शासकीय कामे सर्वात जास्त करवून घेतली जात आहेत.त्यामुळेच शासन तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी कर्मचारी वर्गांची भरती करतांना दिसून येत आहे.कंत्राटी कर्मचारी वर्गांची भरती करण्यात तर येत आहे;मात्र समान काम समान वेतनही लागू करणे तितकेच महत्त्वाचे आहे.यासाठी कित्तेक वर्षांपासून  संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट लढा देत आहेत.मात्र शासन स्तरावरून कुणी आधारच देईना..! यासाठी १ मे २०२३ पासून महाराष्ट्रातील संपूर्ण संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत संपावर जाणार असून गडचिरोली जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांचा बेमुदत संपात सहभाग असणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील आरोपी अटकेत.. – आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नागमंदिराजवळील जंगल परिसरात सोमवार १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आलेल्या आरडी एजंटच्या हत्या प्रकरणातील...

अधिकचे आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के पेक्षा अधिकचे ओबीसी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा खेळखंडोबा झाल्याचे...

थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन वनरक्षकाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-थ्रेशर मशिनमध्ये तोल जाऊन एका ३० वर्षीय वनरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार २१ जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मुरमाडी गावातील...

पिकअप वाहनाचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार तर १३ जखमी.. – आज सकाळच्या घटनेने हळहळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील नांदगाव येथे आज,बुधवार २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडून अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला,तर १२ जणांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!