उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- नाट्यश्री कविता स्पर्धेतील पंधरावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २७ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात आंबेटोला येथील कवी तुळशीराम उंदीरवाडे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “सैनिकांचे ऋण” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता ” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला “आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येते. व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
तुळशीराम उंदीरवाडे हे आंबेटोला (जि.गडचिरोली) येथील रहिवासी असून ते राष्ट्रीय खडा तमाशाचे प्रसिद्ध शाहीर आहेत.शंभरावर गितांचे लेखन त्यांनी केलेले आहे .नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘रानगर्भ फुलत आहे ‘ या प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या दोन कविता प्रकाशित झालेल्या आहेत.ते शोधग्राम (सर्च) येथे सेवेत असून विविध स्तरावरुन त्यांचा सत्कार झालेला आहे.ते सातत्याने कविता लेखनाचे कार्य करीत आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा.यादव गहाणे व प्रा. अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या पंधराव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने प्रा.विनय पाटील, पुरुषोत्तम लेनगुरे, जयराम घोंगडे, संतोष कपाले, विलास जेंगठे, गणेश निकम, प्रेमिला अलोने, रेखा दिक्षित, स्वप्नील बांबोळे, पुरुषोत्तम ठाकरे , चरणदास वैरागडे, नरेंद्र गुंडेली, गजानन गेडाम, ज्योत्स्ना बन्सोड, नागोराव सोनकुसरे, वामनदादा गेडाम, राज मुंजाळ, वंदना मडावी, उपेंद्र रोहनकर, खुशाल म्हशाखेत्री, तुळशीराम उंदीरवाडे, वंदना सोरते, प्रशांत गणवीर, सुजाता अवचट, संगीता रामटेके, वसंत चापले, डाॅ. मंदा पडवेकर इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.

