- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर होते.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मंगळवारी विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन पार पडले.प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी विविध आवाहन करत
माओवादग्रस्त जिल्ह्याची ओळख पुसली जात असल्याचे सांगत,हा बदल माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून संविधान स्वीकारल्यामुळेच शक्य झाल्याचे म्हणाले.त्यांनी उर्वरित माओवाद्यांना शस्त्रे खाली ठेवून संविधानाचा स्वीकार करत मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले.बंदुकीचा माओवाद संपत असला तरी ‘शहरी माओवादा’ पासून सावध राहण्याचेही आवाहन त्यांनी केले.”गडचिरोलीचा विकास सुरू झाला असतांना ‘आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या’, ‘मोठ्या प्रमाणात जंगलतोड’ अशा अफवा पसरविण्यात आल्या.अशा अफवांपासून सावध राहा,कारण त्या लोकांना विकासापासून दूर ठेवण्यासाठी पसरवल्या जातात,” असे त्यांनी स्पष्ट केले.अश्यातच नक्षलपीडित कुटुंबीयांतील सदस्यांना विविध विभागांमध्ये गट क व ड च्या पदांवर थेट नियुक्ती देण्याचा शासन निर्णय २०१८ मध्ये निघाला होता.यानुसार नक्षलपीडित कुटुंबांतील २३ युवक-युवतींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल, मंगळवारी २२ जुलैला थेट पोलिस शिपाईपदी नियुक्तीपत्र देण्यात आले.नियुक्ती मिळालेल्यांच्या कुटुंबांतील लोकांची नक्षल्यांनी क्रूरपणे हत्या केली होती.सैरभैर झालेल्या कुटुंबांना यामुळे आधार मिळाला आहे.कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणातील एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी पोलिस दलाचा कार्यक्रमही पार पडला.प्रातिनिधिक स्वरूपात दोन नक्षलपीडित तरुणांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
- Advertisement -

