Wednesday, April 15, 2026
Homeगडचिरोलीनक्षलवाद्यांच्या दहशतीला न जुमानता नागरिकांनी बंदुका केल्या पोलिसांच्या स्वाधीन..!

नक्षलवाद्यांच्या दहशतीला न जुमानता नागरिकांनी बंदुका केल्या पोलिसांच्या स्वाधीन..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात सोमवार २८ जुलै पासून ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षल्यांकडून शहीद सप्ताहाची घोषणा करण्यात आली आहे.सदरच्या काळात नक्षलवादी विविध भागात नक्षली स्मारके तयार करून बॅनर लावत असतात.या कालावधीत नक्षलवादी हिंसक घटना घडवण्याच्या तयारीत असतात.त्यामुळे शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांकडून कोणतीही हिंसक घटना घडू नये, याकरीता जिल्हा पोलिस दलाकडून नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. अश्यातच आता जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील दामरंचा भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या दहशतीला न जुमानता स्वतःकडील ३ बंदुका व १ नग बंदुकीचे बॅरेल दामरंचा उपपोलीस स्टेशन येथील पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत.आदिवासी बांधव वन्यजीव संरक्षण तसेच शिकारासाठी परंपरेने बंदुका बाळगायचे.नक्षलवादी हे अतिदुर्गम आदिवासी भागातील नागरिकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत स्थानिकांना आपल्या संघटनेत सामील करून घ्यायचे.मात्र,आता सर्वत्र चित्र बदलू लागलेय,लोकांना चुकून कळलेय की आपण काय करत आहोत.त्यामुळे नक्षलवाद्यांच्या आमिषाला बळी न पडता नागरिक त्यांच्यापासून दूर होऊ लागले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!