Saturday, March 15, 2025
Homeगडचिरोलीदहावी,बारावीच्या परीक्षा होणार कॉपीमुक्त - प्रशासनाकडून बंदोबस्त,भरारी पथकांचे नियोजन- बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी...
spot_img

दहावी,बारावीच्या परीक्षा होणार कॉपीमुक्त – प्रशासनाकडून बंदोबस्त,भरारी पथकांचे नियोजन- बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २ मार्च रोजी 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- फेब्रुवारी-मार्च मध्ये आयोजित इयत्ता १२ वी व इयत्ता १० वीची परिक्षा लवकरच सुरु होणार आहे.यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.परीक्षेसाठी शिक्षण विभाग पुर्ण क्षमतेने कार्य करीत असून परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक भेट देवून गैरप्रकार थांबविणार आहेत.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४९ परीक्षा केंद्रे असून इयत्ता १२ वी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी संख्या ही १२३४६ आहेत.तर इयत्ता १० वी परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी संख्या १५०९६ आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळा मार्फत इयत्ता १२ वी ची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२३  ते २१ मार्च २०२३ पर्यंत व इयत्ता १० वी ची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात येत आहे.परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे.शालेय शिक्षण विभागाचे परीपत्रक १४ फेब्रुवारी २०२३ अन्वये  जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांची जिल्हा नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.तर तालुकास्तरावर तहसिलदार यांची तालुका नोडेल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.व जिल्हा समन्वयक म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची नियुक्ती केली आहे. 

संभाव्य कॉपीचे प्रमाण असणारे केंद्र व संभाव्य कॉफीचे प्रमाण अधिक असणारे परीक्षा केंद्र – 

परीक्षा केंद्रावर या पुर्वी झालेल्या परीक्षेत ५ किंवा त्यापेक्षा जास्त कॉपी केसेस झाल्या आहेत.ते केंद्र संभाव्य कॉफीचे प्रमाण असणारे केंद्र.तर ज्या परीक्षा केंद्रावर बाहेरुन उपद्रव होतो.अशी संभाव्य कॉपीचे प्रमाण अधिक असणारे परीक्षा केंद्र  ठरविण्यात आली आहेत. 

संभाव्य कॉपीचे प्रमाण असणारे परीक्षा केंद्र – इयत्ता १२ वी मधे ६ आहेत व इयत्ता १० वी मधे १२ आहेत.कॉपीचे प्रमाण अधिक असणारे परीक्षा केंद्र इयत्ता १२ वी मधे १० आहेत. इयत्ता १० वी चे १० आहेत.या परीक्षा केंद्रावर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात येणार आहे.

जनजागृती मोहिम – शिक्षक,मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांना कार्यशाळा घेऊन माहिती देण्यात आली आहे.जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक,मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जिल्हा दक्षता समिती नियुक्ती करण्यात आली आहे.परीक्षा दरम्यान ते विविध परीक्षा केंद्रांवर भेटीही देणार आहेत.

पोलीस बंदोबस्त – सर्व परीक्षा केंद्रावर  परीक्षा कालावधीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे.५० मीटर चे आत अनधिकृत व्यक्तीला प्रवेश नाही.१९७३ च्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हात परीक्षा कालावधी करीता लागु करण्यात येत आहे.परीक्षा केंद्र परिसरातील झेराक्स  सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येतील.

विद्यार्थ्यांची तपासणी –

परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यानी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपुर्वी आर्धा तास अगोदर हजर राहणे अत्यावश्यक असल्याचे शिक्षण विभागाने आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांची  परीक्षा केंद्रावर तपासनी केली जाईल. मुलांची पोलीस पाटील, कोतवाल,शाळेतील पुरष कर्मचारी करणार आहेत. तसेच मुलींची तपासणी अंगणवाडी सेविका,मदतनिस व शाळेतील महिला कर्मचारी यांचे कडुन स्वतंत्र कक्षामध्ये केली जाणार आहे.विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित होण्यासाठी मानव विकास कार्यक्रम अंतर्गतच्या बसेसची वेळेत उपलब्ध करुन  देण्याबाबत आगार प्रमुख यांना सुचना देण्यात आल्या आहेत.

महसुल विभागाची बैठी पथके व भरारी पथक नेमण्यात आली आहेत.यानुसार प्रशासनाकडून सर्वतोपरी नियोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी परीक्षे दरम्यान निश्चित राहून परीक्षा द्यावी.असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!