Tuesday, July 7, 2026
Homeपरभणी'ते' दोघेही निघाले प्रेमी; नवजात अर्भक ट्रॅव्हल्समधून बाहेर फेकल्याचे प्रकरण..

‘ते’ दोघेही निघाले प्रेमी; नवजात अर्भक ट्रॅव्हल्समधून बाहेर फेकल्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
परभणी :-पुण्याहून परभणीकडे जाणाऱ्या ‘संत प्रयाग’ नामक खासगी ट्रॅव्हल्समध्ये काळीज हेलावणारी घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवार १५ जुलै रोजी सकाळच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील पाथरी ते सेलू मार्गावरील देवनांदरा शिवारात घडली होती.धावत्या ट्रॅव्हल्समध्ये महिलेची प्रसूती झाली आणि नवजात अर्भकास ट्रॅव्हल्समधूनच बाहेर फेकण्यात येत असतांनाच सदरची बाब ही इतर प्रवाशांच्या लक्षात आली आणि याबाबत पाथरी पोलिसांना माहिती दिली होती.पोलिसांनी घटनास्थळावरून नवजात अर्भक ताब्यात घेत तपास केला असता नवजात अर्भक बालक (पुल्लिंग) असल्याचे निष्पन्न झाले होते.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ ट्रॅव्हल्सचा शोध घेत परभणीमध्ये बस थांबवून प्रवाशांची कसून चौकशी केली आणि एका महिलेसह पुरुषाला ताब्यात घेतले होते.तपासाअंती संबंधित महिला व पुरुष हे एकमेकांचे पती-पत्नी असल्याचे सांगत होते.अश्यातच आता ते दोघेही प्रियकर व प्रेयसी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.१९ वर्षीय रितिका ढेरे व २१ वर्षीय अल्ताफ शेख अशी दोघांची नावे असून बाळाचा जन्म होताच घाबरलेल्या अल्ताफनेच बालकास ट्रॅव्हल्सच्या खिडकीतून बाहेर फेकले होते.यात त्याचा मृत्यू झाला होता.सदरची कारवाई पोलिस निरीक्षक महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक लोखंडे, थोरे,वाघ,कदम यांच्या पथकाने केली होती.आता पाथरी पोलिसांनी प्रियकर व प्रेयसी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिरोंचा-आलापल्ली मार्ग तीन महिन्यांहून अधिक काळासाठी जडवाहतुकीसाठी बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३-सी वरील सिरोंचा-आलापल्ली मार्गावर सुरू असलेल्या महामार्ग बांधकामामुळे आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन या मार्गावरील सर्व प्रकारच्या जड...

कार अपघातातील विमा नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग कार्यरत असून त्याद्वारे ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यात येते.याबाबत...

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!