Thursday, April 16, 2026
Homeलातूरतळीराम कंडक्टरचा अजब कारनामा...- प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यात सोडून कंडक्टर गेला दारू पिण्यासाठी

तळीराम कंडक्टरचा अजब कारनामा…- प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यात सोडून कंडक्टर गेला दारू पिण्यासाठी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

लातूर:-सरकारी बसच्या कंडक्टरचे अजब कृत्य समोर आले आहे.काल गुरुवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस कंडक्टरने दारू पिण्यासाठी प्रवाशांनी भरलेली बस रस्त्याच्या मधोमध सोडून पळ काढला.त्यामुळे अनेक तास बस तेथेच थांबली होती. सध्या कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे.ही घटना गुरुवारी सकाळी लातूर आणि उस्मानाबादमधील कळंब दरम्यान घडली. इकडे कंडक्टरने काटगाव येथे बस थांबवली आणि खाली उतरला.यानंतर तासाभराहून अधिक प्रतीक्षा केल्यानंतर बसमधील सुमारे ३८ प्रवाशांनी त्याचा शोध सुरू केला. बराच प्रयत्न केल्यानंतर तो एका दुकानात दारू पित बसलेला आढळून आला.आरोपी कंडक्टरवर कारवाई करण्यात आल्याची माहिती एमएसआरटीसी उस्मानाबाद विभागीय वाहतूक नियंत्रक यांनी दिली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला निलंबित करण्यात आले. ड्युटीवर असताना कंडक्टरने मद्य प्राशन केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

सूर्य आग ओकू लागला; अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार.. – गरज नसेल तर दुपारी घराबाहेर न पडण्याचा सल्ला..

उद्रेक न्युज वृत्त :-मागील काही दिवसांपासून विदर्भासह महाराष्ट्र उष्णतेमुळे होरपळू लागला आहे.सूर्य आग ओकत असल्यामुळे अनेक जिल्ह्याचे तापमान ४० च्या पार गेले आहे.राज्यात पुढील...

ताडोबात रेस्क्यू सेंटर बांधकामाच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वर्चस्व असलेल्या छोटा मटकाची मागील वर्षाच्या बुद्ध पौर्णिमेला 'ब्रम्हा' वाघाशी झुंज झाली होती.या संघर्षात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!