Monday, December 15, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तट्रकने बाजूने घासल्यामुळे कार खड्ड्यात कोसळून चौघे जागीच ठार तर एकजण जखमी...

ट्रकने बाजूने घासल्यामुळे कार खड्ड्यात कोसळून चौघे जागीच ठार तर एकजण जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ट्रकने बाजूने घासल्यामुळे कार खड्ड्यात कोसळून पुण्यातील चौघे जागीच ठार झाले,तर एक जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडीनजीक ता.वाळवा,जि. सांगली येथे घडली.
भीषण अपघातात आनंद भीमराव कदम,महंमदअली शौकतअली सय्यद,जेकेब मायकल पाटोळे व युसूफ रफिक शेख सर्व रा.पुणे अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी शुभम गणेश चवंडके गवळीवाडा, पुणे यांनी फिर्याद दिली आहे.ट्रकचालक फकीर आप्पा जीड्डीमनी याच्यावर कुरळप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे येथील पाच मित्र
शुक्रवारी रात्री उशिरा कार क्रमांक-एमएच १२ एक्सएच ३२७८ कारने गोव्याला निघाले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांची कार पुणे-बंगळूर महामार्गावरील तांदुळवाडीजवळ आली असता, कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक-केए २२ डी ६९९९ ट्रक चालकाने त्यांच्या कारला डाव्या बाजूने घासले.त्यामुळे कार बाजूला ओढ्याच्या पुलाचे काम सुरू असणाऱ्या खड्ड्यात गेली.यावेळी कारचा समोरील भाग खड्ड्यात असणाऱ्या गाळात अडकला.त्यामुळे खड्ड्यातील पाणी कारमध्ये शिरले.त्यामुळे चारही जण कारमध्ये अडकून पडले.त्यांना काहीच हालचाल करता आली नाही.त्यामुळे पाण्यात बुडाल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान,दीपक खोमणे यांनी अपघाताची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील, उपनिरीक्षक सुनील माने यांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अभिषेक शिरोळे यांनी मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील माने करीत आहेत.
प्रवासाला निघालेल्या युवकांकडे असणारी कार अत्याधुनिक होती.दिवाळीतच ही कार घेतली होती. मात्र,स्वयंचलित प्रणाली व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली कार चौघांचा जीव वाचवू शकली नाही; याची चर्चा कुरळप आरोग्य केंद्र परिसरात उपस्थित नातेवाईक,मित्रमंडळी यांच्यात सुरू होती. कार उभी पाण्यात पडल्याने एअरबॅगही उघडल्या नाहीत.रात्री पाचजण गोव्याला सुट्टी आनंद घेण्यासाठी निघाले होते.मात्र,काळाने त्यांच्यावर घाला घातला.गाडीत पाचजण होते; यापैकी चौघे या अपघातात जागीच मृत झाले,तर यातील एक बचावल्याने ‘काळ आला होता,पण वेळ आली नव्हती’चा प्रत्यय आल्याचे बोलले जात होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!