Saturday, March 15, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तट्रकने बाजूने घासल्यामुळे कार खड्ड्यात कोसळून चौघे जागीच ठार तर एकजण जखमी...
spot_img

ट्रकने बाजूने घासल्यामुळे कार खड्ड्यात कोसळून चौघे जागीच ठार तर एकजण जखमी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ट्रकने बाजूने घासल्यामुळे कार खड्ड्यात कोसळून पुण्यातील चौघे जागीच ठार झाले,तर एक जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तांदुळवाडीनजीक ता.वाळवा,जि. सांगली येथे घडली.
भीषण अपघातात आनंद भीमराव कदम,महंमदअली शौकतअली सय्यद,जेकेब मायकल पाटोळे व युसूफ रफिक शेख सर्व रा.पुणे अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी शुभम गणेश चवंडके गवळीवाडा, पुणे यांनी फिर्याद दिली आहे.ट्रकचालक फकीर आप्पा जीड्डीमनी याच्यावर कुरळप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे येथील पाच मित्र
शुक्रवारी रात्री उशिरा कार क्रमांक-एमएच १२ एक्सएच ३२७८ कारने गोव्याला निघाले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांची कार पुणे-बंगळूर महामार्गावरील तांदुळवाडीजवळ आली असता, कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक क्रमांक-केए २२ डी ६९९९ ट्रक चालकाने त्यांच्या कारला डाव्या बाजूने घासले.त्यामुळे कार बाजूला ओढ्याच्या पुलाचे काम सुरू असणाऱ्या खड्ड्यात गेली.यावेळी कारचा समोरील भाग खड्ड्यात असणाऱ्या गाळात अडकला.त्यामुळे खड्ड्यातील पाणी कारमध्ये शिरले.त्यामुळे चारही जण कारमध्ये अडकून पडले.त्यांना काहीच हालचाल करता आली नाही.त्यामुळे पाण्यात बुडाल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान,दीपक खोमणे यांनी अपघाताची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विक्रम पाटील, उपनिरीक्षक सुनील माने यांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.कुरळप प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अभिषेक शिरोळे यांनी मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील माने करीत आहेत.
प्रवासाला निघालेल्या युवकांकडे असणारी कार अत्याधुनिक होती.दिवाळीतच ही कार घेतली होती. मात्र,स्वयंचलित प्रणाली व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली कार चौघांचा जीव वाचवू शकली नाही; याची चर्चा कुरळप आरोग्य केंद्र परिसरात उपस्थित नातेवाईक,मित्रमंडळी यांच्यात सुरू होती. कार उभी पाण्यात पडल्याने एअरबॅगही उघडल्या नाहीत.रात्री पाचजण गोव्याला सुट्टी आनंद घेण्यासाठी निघाले होते.मात्र,काळाने त्यांच्यावर घाला घातला.गाडीत पाचजण होते; यापैकी चौघे या अपघातात जागीच मृत झाले,तर यातील एक बचावल्याने ‘काळ आला होता,पण वेळ आली नव्हती’चा प्रत्यय आल्याचे बोलले जात होते.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!