Tuesday, June 16, 2026
Homeगडचिरोली'टी-६' वाघिणीमुळे वन विभागाची वाढली डोकेदुखी-८० ट्रॅप कॅमेरे लावूनही 'टी-6' वाघीण दिसेना..!

‘टी-६’ वाघिणीमुळे वन विभागाची वाढली डोकेदुखी-८० ट्रॅप कॅमेरे लावूनही ‘टी-6’ वाघीण दिसेना..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.जिल्ह्यातील देसाईगंज आणि गडचिरोली वनविभागात वाघांनी पाळीव जनावरांसह अनेक नागरिकांचा बळी घेतला आहे.हल्ल्यांमध्ये सीटी-1 आणि टी-६ वाघ-वाघिणीने सर्वाधिक हल्ले केल्याचे समोर आले आहे.वनविभागाद्वारे दोन्ही वाघांना पकडण्याची मोहीम हाती घेण्या आली होती.दरम्यान १३ ऑक्टोबर २०२२ ला वडसा वनपरिक्षेत्रात सीटी -१ वाघाला जेरबंद करण्यात आले होते.तब्बल तीन महिन्यानंतर या वाघाला पकडण्यात वनविभागाला यश आले होते. 

मात्र १० जणांचा बळी घेणाऱ्या ‘टी-६’ वाघिणीला तिच्या दोन बछड्यांसह सुरक्षितपणे पकडण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून वनकर्मचाऱ्यांचे पथक पोर्ला आणि चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत सतत शोध घेत आहेत.नरभक्षक टी-६ वाघिण वनकर्मचाऱ्यांच्या नजरेपासून दूरच असल्याचे दिसून येत आहे.तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून सुमारे ८० ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत.मात्र गेल्या काही दिवसांपासून लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्येही वाघिण नजरेस पडत नसल्याने तिला पकडण्याचे मोठे आव्हान वनकर्मचाऱ्यांसमोर उभे आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ होणार स्थापन.. – केंद्र चालक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत.यामध्ये ११५...

आता प्रथमच होणार जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला गती देण्यासाठी प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण राबविण्यात येत असून,गडचिरोली जिल्ह्यात...

उद्यापासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर; अनेक कामे पडणार ठप्प..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात प्रशासन सकारात्मक भूमिका न घेता केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत...

विदर्भातील जिल्हे वगळता आजपासून शाळेला सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील ११ जिल्हे वगळता आज,सोमवार १५ जूनपासून राज्यातील शाळांना अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!