Friday, April 17, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली व कुरखेडाच्या दादापुर येथील रुग्णांना मिळाली मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत..

गडचिरोली व कुरखेडाच्या दादापुर येथील रुग्णांना मिळाली मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दोन गरजू रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे.यामध्ये , गडचिरोलीच्या गोकुलनगर येथील रहिवासी किरण दिनेश कोहचाळे तर कुरखेडा तालुक्याच्या दादापूर येथील तथागत मोहन वैद्य यांचा समावेश आहे.हे दोन्ही रुग्ण सध्या नागपूर येथे उपचार घेत असून किरण कोहचाळे यांना हृदयरोगाच्या उपचारासाठी तर तथागत मोहन वैद्य यांना मेंदूरोगाच्या उपचारासाठी मदत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून पूर, दुष्काळ,आगसदृश्य नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना तातडीने मदत केली जाते. तसेच,हृदय,किडनी,यकृत,फुफ्फुस प्रत्यारोपण, कर्करोग,अपघात,नवजात शिशूंचे आजार,मेंदू विकार, डायलिसीस अशा महागड्या उपचारांची गरज भासणाऱ्या रुग्णांना मदत मंजूर केली जाते.यापूर्वी
३ जून २०२५ रोजी कुरखेडा येथील अविनाश दुबे यांना हृदयविकारावरील उपचारांसाठी एक लाख रुपयांची मदत या कक्षाच्या माध्यमातून करण्यात आली होती.त्यानुसार आता जिल्ह्यातील तीन रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इतर गरजू आणि पात्र रुग्णांनीही मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ घेण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता कक्षाशी संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.यामुळे अनेक गरजू रुग्णांना उपचारासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळू शकते.मुख्यमंत्री सहायता निधी गरजू रुग्णांना त्यांच्या गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत देऊन आधार देत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! कासवांची तस्करी करणाऱ्यांकडून धक्कादायक बाबी उघड.. – अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपक्षेत्राच्या नियतक्षेत्र शिर्शी बिटातील चिचडोह बॅरेजवरून हरंबा गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर कासवाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याची...

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!