Monday, December 15, 2025
Homeगडचिरोलीआष्टी शहराच्या छत्रपती शिवाजी चौक परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची ग्रामस्थांची मागणी..

आष्टी शहराच्या छत्रपती शिवाजी चौक परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची ग्रामस्थांची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहराच्या छत्रपती शिवाजी चौक परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी आष्टी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन,पोलीस प्रशासन व संबंधित विभागाकडे केली आहे.आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.अनेक वाहनचालक सुसाट वेगाने वाहने पळवित असतात.येथील मार्गावरून शालेय विद्यार्थी,पादचारी,सायकलस्वार तसेच दाट वस्तीचा भाग असल्याने या परिसरात अपघाताचा धोका वाढला आहे. अलीकडच्या काळात या परिसरात काही किरकोळ अपघातही घडले आहेत,भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये,यासाठी छत्रपती शिवाजी चौक येथे स्पीड ब्रेकर बसविणे अत्यावश्यक झाले आहे.त्यामुळे वाहतूक विभागाशी समन्वय साधून तातडीने स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी आष्टी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत आष्टी ग्रामपंचायतीच्या सरपंचा बेबीताई बुरांडे व आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन सादर करतेवेळी आनंद कांबळे,आशिष क्षिरसागर,रत्नाकर गोटमुकुलवार,सिद्धार्थ जिल्हेकर, आकाश हिंगाणे,तुषार येलमुले सह आष्टी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!