- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी शहराच्या छत्रपती शिवाजी चौक परिसरात स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी आष्टी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन,पोलीस प्रशासन व संबंधित विभागाकडे केली आहे.आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.अनेक वाहनचालक सुसाट वेगाने वाहने पळवित असतात.येथील मार्गावरून शालेय विद्यार्थी,पादचारी,सायकलस्वार तसेच दाट वस्तीचा भाग असल्याने या परिसरात अपघाताचा धोका वाढला आहे. अलीकडच्या काळात या परिसरात काही किरकोळ अपघातही घडले आहेत,भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये,यासाठी छत्रपती शिवाजी चौक येथे स्पीड ब्रेकर बसविणे अत्यावश्यक झाले आहे.त्यामुळे वाहतूक विभागाशी समन्वय साधून तातडीने स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी आष्टी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.याबाबत आष्टी ग्रामपंचायतीच्या सरपंचा बेबीताई बुरांडे व आष्टी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन सादर करतेवेळी आनंद कांबळे,आशिष क्षिरसागर,रत्नाकर गोटमुकुलवार,सिद्धार्थ जिल्हेकर, आकाश हिंगाणे,तुषार येलमुले सह आष्टी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
- Advertisement -

