Monday, December 15, 2025
Homeकोल्हापूरआम्ही तयार आहोत; अर्ध्या पगारावर काम करायला; तेही विना पेन्शन- सुशिक्षित बेरोजगार...

आम्ही तयार आहोत; अर्ध्या पगारावर काम करायला; तेही विना पेन्शन- सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीचा मोर्चा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोल्हापूर :- जुनी पेन्शन योजना थांबवून महाराष्ट्र राज्याला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आपण मोर्च्यात सहभागी व्हा; असे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले.त्यानंतर आज शुक्रवारी १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जुन्या पेन्शन विरोधात कोल्हापुरात बेरोजगार युवक युवतीचा मोर्चा काढण्यात आला.

सोशल मीडियातील पोस्ट बघून काही बेरोजगार युवक दसरा चौकात जमले होते.दोन दिवसांत रीतसर परवानगी काढून पुन्हा मोर्चा काढणार असल्याचा निर्धार बेरोजगार युवकांनी केला आहे.

राज्यात एकीकदे बेरोजगारांच्या हाताला काम नाही.शेतकऱ्यांच्या पिकाला दाम मिळत नाही. नोकरदार हजारो रुपये कमवतात.त्यातल्या त्यात काही कर्मचारी दोन नंबरचे पैसे कमवतात.काही कर्मचारी कमिशनवर काम करतात.हे सारे सुरू असताना त्यांना जुनी पेन्शन योजना कशासाठी असा सवाल बेरोजगार युवकांनी केला आहे.


आज कोल्हापुरात बेरोजगार एकत्र आले.यानंतर पुन्हा इतर शहरातील बेरोजगार जुन्या पेन्शनविरोधात एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

९० टक्के आमदार,खासदार हे करोडपती आहेत. त्यांना खरचं पेन्शनची गरज आहे का?असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विचारला.जुनी पेन्शन योजना लागू करू नका.त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढा आणि लोकप्रतिनिधींना मिळणारी पेन्शन बंद करा.सर्वांचीच पेन्शन बंद करा; अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही.बेरोजगारांना काम मिळत नाही आणि सरकारी नोकरदारांना हजारो रुपये पगार मिळतो.तरी त्यांना पेन्शनची गरज काय? असा सवाल सामान्य लोकांकडून विचारला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!