उद्रेक नुज वृत्त :-शासनाने सर्वसामान्यांना सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता यावा,तसेच सणाला गोडधोड पदार्थ करून घरातील सदस्यांचा आनंद द्विगुणित व्हावा,याकरिता ‘आनंदाचा शिधा’ योजना सुरू केली होती.नुकत्याच झालेल्या होळीच्या सणालाही आनंदाचा शिधासोबतच साडी देण्याची घोषणा केली होती.पण,या होळीला शिधाच आला नाही.सर्व शिधापत्रिकाधारकांना ४ ऑक्टोंबर २०२२ पासून आनंदाचा शिधा वितरित केला जायचा.आतापर्यंत दिवाळी,गौरी गणपती,श्रीराम नवमी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,छत्रपती शिवाजी महाराज जयंती व यंदा होळीलाही आनंदाचा शिधा देण्याची घोषणा शासनाने केली होती.त्यामुळे साडीसोबतच आनंदाचा शिधा मिळणार असल्याने शिधापत्रिकाधारकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु,अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘आनंदाचा शिधा’ या योजनेला शासनाने थांबा दिल्याने लाभार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.त्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर उमटत आहे.तर होळीनिमित्त अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना साडी देण्याविषयी सांगण्यात आले असले,तरी काही ठिकाणी साड्यांचे वाटप करण्यात आले तर काही ठिकाणी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे.तत्कालीन सरकारने लाडकी बहीण योजना,आनंदाचा शिधा,ज्येष्ठांना मोफत बस प्रवास, महिलांना सवलतीत बस प्रवास,तीर्थदर्शन योजना अशा अनेक लोकप्रिय घोषणा करून ठेवल्या.ऐन निवडणूक काळात शेतकरी कर्जमाफीबाबतदेखील सूतोवाच करण्यात आले होते.मात्र,या घोषणा करत असतांना आर्थिक स्थितीचा विचार झाला नसल्याचे आता दिसून येत आहे.यामुळेच टप्प्याटप्याने या योजनांना कात्री लावण्याचे काम केले जात असल्याचा आरोप होतो आहे.
‘आनंदाचा शिधा’ योजनेला शासनाचा थांबा..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES