- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील बदल्यांचे सत्र संपता-संपेना..! राज्य सरकारकडून आतापर्यंत अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या(IAS) बदल्या करण्यात आल्या आहेत.अशातच आज,मंगळवार २२ एप्रिलला राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.आता चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी(सिईओ)म्हणून पुलकित सिंग यांना नियुक्त करण्यात आले आहे.तर यापूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना बीड जिल्हाधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले आहे.बीड जिल्हा हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने हादरवून सोडणारा जिल्हा आहे.
१. पुलकित सिंग हे २०२१ बॅचचे आयएएस अधिकारी असून यापूर्वी ते सहाय्यक जिल्हाधिकारी,अंबड उपविभाग,जालना या ठिकाणी कार्यरत होते.आता त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर येथे नियुक्त करण्यात आले आहे.
२. विवेक जॉन्सन हे २०१८ बॅचचे आयएएस अधिकारी असून यापूर्वी ते मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद चंद्रपूर या ठिकाणी कार्यरत होते.तर आता त्यांना बीड येथे नियुक्त करण्यात आले आहे.
३. अविनाश पाठक हे २०१३ बॅचचे आयएएस अधिकारी असून यापूर्वी ते जिल्हाधिकारी बीड या ठिकाणी कार्यरत होते.तर आता त्यांना व्यवस्थापकीय संचालकपदी,मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ,मुंबई या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे.
४. शुभम गुप्ता हे २०१९ बॅचचे आयएएस अधिकारी असून यापूर्वी ते सदस्य सचिव,विदर्भ वैधानिक विकास मंडळ,नागपूर या ठिकाणी कार्यरत होते.तर आता त्यांना व्यवस्थापकीय संचालक,पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ,पुणे या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहे.
५. अभिषेक कृष्णा हे २००६ बॅचचे आयएएस अधिकारी असून यापूर्वी ते सदस्य सचिव,महा.जीवन प्राधिकरण मुंबई या ठिकाणी कार्यरत होते.तर आता त्यांची संचालक,महानगरपालिका प्रशासन,मुंबई या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
- Advertisement -