- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही दिवसांनी मूळ गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल. राज्य मंडळाने दहावीची पुरवणी परीक्षा १६ जून ते ३० जून२०२६ रोजी,तर बारावीची परीक्षा १६ जून ते ८ जुलै या कालावधीत घेतली.त्यात दहावीच्या परीक्षेसाठी एकूण ४८ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी,तर बारावीच्या परीक्षेसाठी १ लाख ४ हजार ४९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गुणपडताळणी,उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पध्दतीने
https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.त्यासाठी १५ ते २४ जुलै या कालावधीत ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरता येणार आहे.विशेष म्हणजे,पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आधी छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्या पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क भरून भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisement -

