- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-हिवाळी अधिवेशनाला आजपासून म्हणजेच १६ डिसेंबर पासून सुरुवात होत आहे.सुरू होत असलेल्या अधिवेशनात वीस विधेयके मांडली जाणार आहेत.राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.मागील सरकारने काढलेल्या अनेक अध्यादेशांचे कायद्यात रूपांतर करण्याचे काम या अधिवेशनात केले जाईल,असे ते म्हणाले.
दरम्यान,हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे.संख्या कमी असूनही सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडणार नसल्याचे संकेत विरोधकांनी दिले आहेत.हिवाळी अधिवेशन केवळ सहा दिवस आयोजित केल्याने विरोधकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.ही नाराजी सभागृहातही दिसून येण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून विरोधक अद्याप बाहेर येऊ शकलेले नाहीत,याचे संकेत त्यांच्या पत्रकार परिषदेतच दिसून आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हणाले, तसेच पत्रपरिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार या दोघांच्याही चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता.दुसरीकडे, सरकारनेही सभागृहात विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

